एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी होणार बदल, रस्त्यावर धावणार खासगी बसेस...

मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे एसटी महामंडळाला फायदा होऊ शकतो. जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर खासगी बसेस चालवण्याचे नियोजन राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहे. खासगी बससेच्या व्होल्वो कंपनीला एसटीचा लोगो, तिकिट सेवा आणि एसटी थांबे प्रदान करण्यात येणार आहेत, त्यामुळे खाजगी बस कंपनीला फायदा होणार असून, त्यातील 14 टक्के हिस्सा राज्य सरकारला देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 30 शयनयान, आणि 70 आसनी, अशा 100 व्होल्वो बस दाखल होणार आहेत.

एसटीची आर्थिक स्थिती सुधरण्यासाठी प्रतिदिन 34 कोटी अपेक्षित असून सद्यस्थिती एसटी महामंडळाला 30 कोटी उत्पन्न मिळत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असूनही एसटीला  जास्त प्रमाणात नफा झाला नाही. भाडेवाढ होऊनही एसटीची तिजोरी रिक्त आहे. प्रवाशांनी देखील एसटीकडे पाठ फिरवली असल्याने एसटी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. एसटी ज्या मार्गांवरुन धावणार आहे त्या मार्गांवरती प्रवाशांसाठी सुख सोयी उभारण्याकरता व्होल्वो खासगी कंपनी तर्फे नियोजन करण्यात येणार आहे. या बसचा खासगी चालक आणि वाहक दोन्हींचा खर्च खासगी कंपनीचा असून एसटी प्रवासी मोठ्या प्रमाणात खासगी बसने प्रवास करतील, या बदल्यात खासगी बसकडून मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाला महसूल मिळेल. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत किती टक्के वाढ होईल ते पाहणंं महत्वाचं असणार आहे.
Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद