एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी होणार बदल, रस्त्यावर धावणार खासगी बसेस...

मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे एसटी महामंडळाला फायदा होऊ शकतो. जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर खासगी बसेस चालवण्याचे नियोजन राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहे. खासगी बससेच्या व्होल्वो कंपनीला एसटीचा लोगो, तिकिट सेवा आणि एसटी थांबे प्रदान करण्यात येणार आहेत, त्यामुळे खाजगी बस कंपनीला फायदा होणार असून, त्यातील 14 टक्के हिस्सा राज्य सरकारला देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 30 शयनयान, आणि 70 आसनी, अशा 100 व्होल्वो बस दाखल होणार आहेत.

एसटीची आर्थिक स्थिती सुधरण्यासाठी प्रतिदिन 34 कोटी अपेक्षित असून सद्यस्थिती एसटी महामंडळाला 30 कोटी उत्पन्न मिळत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असूनही एसटीला  जास्त प्रमाणात नफा झाला नाही. भाडेवाढ होऊनही एसटीची तिजोरी रिक्त आहे. प्रवाशांनी देखील एसटीकडे पाठ फिरवली असल्याने एसटी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. एसटी ज्या मार्गांवरुन धावणार आहे त्या मार्गांवरती प्रवाशांसाठी सुख सोयी उभारण्याकरता व्होल्वो खासगी कंपनी तर्फे नियोजन करण्यात येणार आहे. या बसचा खासगी चालक आणि वाहक दोन्हींचा खर्च खासगी कंपनीचा असून एसटी प्रवासी मोठ्या प्रमाणात खासगी बसने प्रवास करतील, या बदल्यात खासगी बसकडून मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाला महसूल मिळेल. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत किती टक्के वाढ होईल ते पाहणंं महत्वाचं असणार आहे.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात