एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी होणार बदल, रस्त्यावर धावणार खासगी बसेस...

मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे एसटी महामंडळाला फायदा होऊ शकतो. जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर खासगी बसेस चालवण्याचे नियोजन राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहे. खासगी बससेच्या व्होल्वो कंपनीला एसटीचा लोगो, तिकिट सेवा आणि एसटी थांबे प्रदान करण्यात येणार आहेत, त्यामुळे खाजगी बस कंपनीला फायदा होणार असून, त्यातील 14 टक्के हिस्सा राज्य सरकारला देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 30 शयनयान, आणि 70 आसनी, अशा 100 व्होल्वो बस दाखल होणार आहेत.

एसटीची आर्थिक स्थिती सुधरण्यासाठी प्रतिदिन 34 कोटी अपेक्षित असून सद्यस्थिती एसटी महामंडळाला 30 कोटी उत्पन्न मिळत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असूनही एसटीला  जास्त प्रमाणात नफा झाला नाही. भाडेवाढ होऊनही एसटीची तिजोरी रिक्त आहे. प्रवाशांनी देखील एसटीकडे पाठ फिरवली असल्याने एसटी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. एसटी ज्या मार्गांवरुन धावणार आहे त्या मार्गांवरती प्रवाशांसाठी सुख सोयी उभारण्याकरता व्होल्वो खासगी कंपनी तर्फे नियोजन करण्यात येणार आहे. या बसचा खासगी चालक आणि वाहक दोन्हींचा खर्च खासगी कंपनीचा असून एसटी प्रवासी मोठ्या प्रमाणात खासगी बसने प्रवास करतील, या बदल्यात खासगी बसकडून मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाला महसूल मिळेल. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत किती टक्के वाढ होईल ते पाहणंं महत्वाचं असणार आहे.
Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार