एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी होणार बदल, रस्त्यावर धावणार खासगी बसेस...

मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे एसटी महामंडळाला फायदा होऊ शकतो. जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर खासगी बसेस चालवण्याचे नियोजन राज्य सरकार तर्फे करण्यात आले आहे. खासगी बससेच्या व्होल्वो कंपनीला एसटीचा लोगो, तिकिट सेवा आणि एसटी थांबे प्रदान करण्यात येणार आहेत, त्यामुळे खाजगी बस कंपनीला फायदा होणार असून, त्यातील 14 टक्के हिस्सा राज्य सरकारला देण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 30 शयनयान, आणि 70 आसनी, अशा 100 व्होल्वो बस दाखल होणार आहेत.

एसटीची आर्थिक स्थिती सुधरण्यासाठी प्रतिदिन 34 कोटी अपेक्षित असून सद्यस्थिती एसटी महामंडळाला 30 कोटी उत्पन्न मिळत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात लग्नसमारंभ असूनही एसटीला  जास्त प्रमाणात नफा झाला नाही. भाडेवाढ होऊनही एसटीची तिजोरी रिक्त आहे. प्रवाशांनी देखील एसटीकडे पाठ फिरवली असल्याने एसटी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. एसटी ज्या मार्गांवरुन धावणार आहे त्या मार्गांवरती प्रवाशांसाठी सुख सोयी उभारण्याकरता व्होल्वो खासगी कंपनी तर्फे नियोजन करण्यात येणार आहे. या बसचा खासगी चालक आणि वाहक दोन्हींचा खर्च खासगी कंपनीचा असून एसटी प्रवासी मोठ्या प्रमाणात खासगी बसने प्रवास करतील, या बदल्यात खासगी बसकडून मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाला महसूल मिळेल. त्यामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीत किती टक्के वाढ होईल ते पाहणंं महत्वाचं असणार आहे.
Comments
Add Comment

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन