Warkari Accident: देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

देहू: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरूवात झालेली असतानाच एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. देहूगाव ते आळंदी रस्त्यावर एका वारकऱ्यास भरधाव क्रेनने धडक दिल्याने यात गंभीर जखमी होऊन सदर वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. देहू-आळंदी मार्गावरील तळवडे येथे ही घटना घडली.


नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालकास ताब्यात घेतले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, नारायण गोदवे हे देहूहून आळंदीच्या दिशेने पायी निघाले होते. तळवडे येथील शेलार वस्तीजवळ ते आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान वारी सोहळ्याची सुरूवात होत असतानाच हा अपघात झाल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ