Warkari Accident: देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

देहू: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरूवात झालेली असतानाच एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. देहूगाव ते आळंदी रस्त्यावर एका वारकऱ्यास भरधाव क्रेनने धडक दिल्याने यात गंभीर जखमी होऊन सदर वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. देहू-आळंदी मार्गावरील तळवडे येथे ही घटना घडली.


नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालकास ताब्यात घेतले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, नारायण गोदवे हे देहूहून आळंदीच्या दिशेने पायी निघाले होते. तळवडे येथील शेलार वस्तीजवळ ते आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान वारी सोहळ्याची सुरूवात होत असतानाच हा अपघात झाल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात