Warkari Accident: देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

  47

देहू: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरूवात झालेली असतानाच एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. देहूगाव ते आळंदी रस्त्यावर एका वारकऱ्यास भरधाव क्रेनने धडक दिल्याने यात गंभीर जखमी होऊन सदर वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. देहू-आळंदी मार्गावरील तळवडे येथे ही घटना घडली.


नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालकास ताब्यात घेतले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, नारायण गोदवे हे देहूहून आळंदीच्या दिशेने पायी निघाले होते. तळवडे येथील शेलार वस्तीजवळ ते आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान वारी सोहळ्याची सुरूवात होत असतानाच हा अपघात झाल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

नांदेडच्या भक्ताकडून माउलींना 1 कोटी सोन्याचा मुकुट अर्पण

पुणे: आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी मंदिरात नांदेड येथील भक्ताकडून एक कोटी रुपयांचा सोन्याचा

एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी होणार बदल, रस्त्यावर धावणार खासगी बसेस...

मुंबई : राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे

Solapur Water Park Accident: पुन्हा एक अपघात! अकलूज सयाजीराजे वॉटर पार्कमधील भीषण दुर्घटना, एकाचा मृत्यू तर इतर जखमी

सोलापूर: अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या पार्कमधील एक

धक्कादायक ! सात ते आठ वाहने एकमेकांना धडकली, मुंबई पोलिसांच्या वाहनाचा समावेश...

अलिबाग : अलिबाग मुंबई पुणे दृतगती मार्गावर (mumbai pune  express highway)  भीषण अपघात झाला.  या अपघातात सात ते आठ वाहने एकमेकांना

​​PMRDA : ​​शिवाजीनगर ते हिंजवडी ​मेट्रो -३ला आणखी विलंब​!

गारेगार प्रवाससाठी वर्षभर थांबाच! ​आयटी अभियंत्यांना थंडगार व आरामदायी प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतिक्षाच

FASTag Annual Pass 2025 : फक्त ३ हजारमध्ये वर्षभर टोलमुक्त प्रवास! गडकरींची घोषणा

आगामी १५ ऑगस्टपासून देशभरात राबवणार योजना नवी दिल्ली : केंद्रीय रस्तेवाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी