Warkari Accident: देहू-आळंदी रस्त्यावर भरधाव क्रेनच्या धडकेत वारकऱ्याचा मृत्यू

देहू: जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याची सुरूवात झालेली असतानाच एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. देहूगाव ते आळंदी रस्त्यावर एका वारकऱ्यास भरधाव क्रेनने धडक दिल्याने यात गंभीर जखमी होऊन सदर वारकऱ्याचा मृत्यू झाला आहे. देहू-आळंदी मार्गावरील तळवडे येथे ही घटना घडली.


नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालकास ताब्यात घेतले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, नारायण गोदवे हे देहूहून आळंदीच्या दिशेने पायी निघाले होते. तळवडे येथील शेलार वस्तीजवळ ते आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. अपघातात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान वारी सोहळ्याची सुरूवात होत असतानाच हा अपघात झाल्याने वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली