Women’s World Cup 2025 : ठरलं...ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक पुन्हा भिडणार! जाणून घ्या टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंकेमध्ये २०२५ च्या महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात येणार आहे. या विश्वचषकात पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. महिला विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी स्पर्धेतील सामना ५ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये होणार आहे. ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने महिला विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २०२५ महिला क्रिकेट विश्वचषक हायब्रिड मॉडेलनुसार खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत पाकिस्तान आपले सर्व सामने श्रीलंकेमध्ये खेळणार आहे.


२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. त्यावेळी भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये खेळवण्यात आले होते. महिला विश्वचषकातील उपांत्य फेरीचा पहिला सामना २९ ऑक्टोबरला कोलंबोमध्ये आणि दुसरा उपांत्य सामना हा ३० ऑक्टोबरला बंगळुरुमध्ये खेळवला जाणार आहे. तर २ नोव्हेंबरला होणाऱा अंतिम फेरीचा सामना बंगळुरु अथवा कोलंबो होणार आहे. पाकिस्तान या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचला तर हा सामना कोलंबोत खेळवण्यात येईल. अन्यथा विश्वचषकाचा अंतिम सामना बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर होईल.



वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक



  • भारत विरुद्ध श्रीलंका- ३० सप्टेंबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध पाकिस्तान- ५ ऑक्टोबर, कोलंबो - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका- ९ ऑक्टोबर, विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- १२ ऑक्टोबर विशाखापट्टणम - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध इंग्लंड- १९ ऑक्टोबर, इंदूर - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध न्यूझीलंड- २३ ऑक्टोबर, गुवाहाटी - दुपारी ३ वाजता

  • भारत विरुद्ध बांगलादेश- २६ ऑक्टोबर, बंगळुरू - दुपारी ३ वाजता


भारतात पाकिस्तानचा सामना नाही..


भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे हा सामना भारतात खेळवला जाणार नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अलीकडेच 'ऑपरेशन सिंदूर' राबवले, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले. याच कारणास्तव, भारताने पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर खेळण्याची परवानगी दिली नाही.

Comments
Add Comment

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी