मुख्यमंत्री दौऱ्यासाठी काही ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल

पालघर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कौशल्य विकास उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आदी मान्यवर सोमवारी पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्या अनुषंगाने मुंबई गुजरात मार्गावर काही ठिकाणच्या वाहतूक मार्गात सकाळी ८ ते रात्री ८ वेळेत बदल करण्यात आले आहेत.


पालघर तालुक्यातील दुर्वेस येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शाळा प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित आहे. त्याचप्रमाणे कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या वतीने मनोर मैदान या ठिकाणी सामंजस्य करार कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अप्पर जिल्हा दंडाधिकारी सुभाष भागडे यांनी वाहतूक मार्गात बदल करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत. हातनदी नाका ते नांदगाव फाटा यादरम्यान सर्व प्रकारची वाहतूक सोमवारी बंद ठेवण्यात आली आहे. तर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत मस्तान नाका ते मनोर मार्गे पालघर शहराकडे येणाऱ्या व पालघर शहराकडून मनोर मार्गे मस्तान नाकाकडे जाणाऱ्या सर्व जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.


मनोर मुंबई गुजरात बाजूकडून पालघर बाजूकडे जाण्यासाठी चिल्हार फाटा बोईसर मार्गे पालघर व वरई फाटा -पारगाव- तांदुळवाडी - चहाडे नाका मार्गे पालघर अशाप्रकारे पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पालघरकडून मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता ते चहाडे नाका-तांदूळवाडी-पारगाव वरई फाटा हायवे अशाप्रकारे आणि गुजरातकडे जाण्यासाठी पालघर चार रस्ता ते बोईसर चिल्हार फाटा हायवे मार्गे वाहतूक वळविण्यात येणार आहे.


दरम्यान अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सदर आदेश लागू राहणार नाही असे प्रशासनाच्या वतीने वाहतूक मार्गात बदल करण्याबाबतचे आदेश निर्गमित केले असुन माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेचे प्रवाशांच्या आशेवर पाणी

नवीन वेळापत्रकानंतरही लोकलचा खोळंबा कायम पालघर : पश्चिम रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल वाढवणे आणि १८ डब्यांच्या

ओनिडा कंपनीच्या गेटवर कामगारांचा एल्गार

पगार रखडल्याने 'सत्याग्रह' सहाव्या दिवशीही सुरूच वाडा : कुडूस येथील प्रसिद्ध मिर्क इलेक्ट्रॉनिक्स (ओनिडा)

वरवाडा पुलाचा खेळखंडोबा!

पूर्वसूचना न देताच पादचारी पूल हटवला तलासरी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वरवाडा येथे असलेली

प्रचाराचा धुरळा शांत; उद्या मतदान

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन तयार विरार :वसई विरार शहर महानगरपालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी

मच्छीमारांसाठी २६ नव्या योजना राबविणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही वसई :मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही

सूर्या प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा सुरू

उजव्या तीर कालव्यावरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात पालघर :सूर्या प्रकल्पांतर्गत डहाणू व पालघर तालुक्यातील