बोरिवली ते ठाणे भुयारी रस्ता प्रकल्प पुनर्वसनाला गती

एमएमआरडीएकडून तीन पर्यायांची घोषणा


मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे (टिकुजिनीवाडी) ते मागाठाणे-बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पासाठी मागाठाणे परिसरातील रूपवते नगर, मिलिंद नगर, फरलेवाडी, एस.आर.ए.प्रकल्पातील तसेच रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अंदाजे ५७२ झोपड्या बाधित होत आहेत.


प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी एमएमआरडीएने तीन पर्यायांची रूपरेषा जाहीर केली असून, बाधित नागरिकांनी या पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा आहे हे लेखी स्वरूपात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे:


१. आर्थिक मोबदला: एमएमआरडीएच्या आर्थिक मोबदला धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या बाधित होणाऱ्या झोपड्यांचे क्षेत्रफळानुसार देय आर्थिक मोबदला स्वीकारता येईल.


२. स्थायी निवास: मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे बोरीवली इंटिग्रेटेड वसाहतीमधील सदनिका व मीरा-भाईंदर येथील रेंटल हाऊसिंग योजनेतील मे. गुजरात व सोनम इंटरप्राईजेस यांनी विकसित केलेल्या सदनिका प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार पुनर्वसनासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येतील.


३. एसआरए प्रकल्पामार्फत पुनर्वसन: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील मे.भारद्वाज विकसकामार्फत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार त्यांना समाविष्ट केले जाईल. विकासकामार्फत प्रकल्प बाधितांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी सदनिका देण्यात येणार असून तात्पुरत्या स्वरूपात त्यांना भाडे अथवा सदनिका उपलब्ध करून देण्यात येतील. एमएमआरडीएने सर्व प्रकल्पबाधित नागरिकांना सूचना केली आहे की त्यांनी वरील तीन पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याबाबत लेखी अर्ज तात्काळ एमएमआरडीएकडे सादर करावेत.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :