बोरिवली ते ठाणे भुयारी रस्ता प्रकल्प पुनर्वसनाला गती

  50

एमएमआरडीएकडून तीन पर्यायांची घोषणा


मुंबई :मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) ठाणे (टिकुजिनीवाडी) ते मागाठाणे-बोरिवली दरम्यान प्रस्तावित दुहेरी भुयारी रस्ता प्रकल्पाची कामे प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पासाठी मागाठाणे परिसरातील रूपवते नगर, मिलिंद नगर, फरलेवाडी, एस.आर.ए.प्रकल्पातील तसेच रस्त्यालगतच्या फूटपाथवरील अंदाजे ५७२ झोपड्या बाधित होत आहेत.


प्रकल्पाचे काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रकल्पग्रस्तांचे तात्काळ पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यासाठी एमएमआरडीएने तीन पर्यायांची रूपरेषा जाहीर केली असून, बाधित नागरिकांनी या पर्यायांपैकी कोणता पर्याय स्वीकारायचा आहे हे लेखी स्वरूपात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे:


१. आर्थिक मोबदला: एमएमआरडीएच्या आर्थिक मोबदला धोरणानुसार प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या बाधित होणाऱ्या झोपड्यांचे क्षेत्रफळानुसार देय आर्थिक मोबदला स्वीकारता येईल.


२. स्थायी निवास: मुंबई महानगर विकास प्राधिकरणातर्फे बोरीवली इंटिग्रेटेड वसाहतीमधील सदनिका व मीरा-भाईंदर येथील रेंटल हाऊसिंग योजनेतील मे. गुजरात व सोनम इंटरप्राईजेस यांनी विकसित केलेल्या सदनिका प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार पुनर्वसनासाठी कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येतील.


३. एसआरए प्रकल्पामार्फत पुनर्वसन: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील मे.भारद्वाज विकसकामार्फत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार त्यांना समाविष्ट केले जाईल. विकासकामार्फत प्रकल्प बाधितांना त्याच ठिकाणी कायमस्वरूपी सदनिका देण्यात येणार असून तात्पुरत्या स्वरूपात त्यांना भाडे अथवा सदनिका उपलब्ध करून देण्यात येतील. एमएमआरडीएने सर्व प्रकल्पबाधित नागरिकांना सूचना केली आहे की त्यांनी वरील तीन पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून त्याबाबत लेखी अर्ज तात्काळ एमएमआरडीएकडे सादर करावेत.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : फडणवीसांचा निशिकांत दुबेनां थेट सल्ला, “आम्ही सक्षम आहोत, वक्तव्यांपूर्वी विचार करा!”

मुंबई : मराठी विरुद्ध हिंदी या वादावर पुन्हा एकदा पेटलेलं राजकारण आता चांगलंच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे

कामानिमित्त मंत्रालयात येत असाल तर हे आधी वाचा...

ऑफलाइन पास देणाऱ्या खिडक्या स्वातंत्र्यदिनापासून बंद मंत्रालय प्रवेशासाठी सर्वसामान्यांना आता ' डीजी' नोंदणी

'टॅरिफ 'मुळे कोकणचा आमरस संकटात

मुंबई (प्रतिनिधी) :अमेरिकेने भारतावर २५ टक्के टैरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मैंगो पल्प)

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल