अभिनेत्री रवीना टंडनने शेअर केला एअर इंडिया विमानाच्या प्रवासाचा अनुभव

  37

मुंबई : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडिया विमानाचा मोठा अपघात झाला.या घटनेनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त केली जात आहे. एअर इंडियाच्या विमान अपघात घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने विमानाने प्रवास केला आहे. यावेळी रवीना टंडन हिने अपघातानंतर एअर इंडिया विमानात काय परिस्थिती होती याचा अनुभव शेअर केला आहे.


अभिनेत्री रविना टंडन आपल्या पोस्टमध्ये म्हणते की, "नवीन सुरुवात.. परिस्थिती विरोधात असताना पुन्हा उडण्याचं आणि मोठं व्हायचं... पुन्हा नवीन सुरुवात करायची. अधिक सक्षम होण्यासाठी नवीन संकल्प करायचे. वातावरण गंभीर होते आणि क्रू मेंबर्स दु:खाची लकेर असलेल्या हसऱ्या चेहऱ्याने स्वागत करत होते. शांत प्रवासी आणि क्रू यांच्यातील अव्यक्त शोकभावना. पण तरीही त्यांच्यातील आत्मविश्वासाने ते जोडले आहेत. ज्यांनी प्रियजन गमावलेले त्या सगळ्या कुटुंबीयांप्रती शोकभावना आहेत. ही जखम कधीच भरुन न निघणारी आहे. एअर इंडिया निर्भय(घाबरत नाही) आहे. त्यामुळे यातूनही आणखी खंबीरपणाने उभी राहील. जय हिंद".


दरम्यान, अहमदाबाद येथून उड्डाण घेताच १२ जून रोजी एअर इंडियाचे विमान मेडिकल हॉस्टेलवर कोसळलं. या अपघातात विमानातील एकूण २४२ पैकी २४१ जणांचा मृत्यू झाला आहे. केवळ एक प्रवासी दैव बलवत्तर म्हणून या भीषण अपघातातून बचावला आहे. तर हॉस्टेलमधील काही निवासी डॉक्टर आणि आसपासच्या परिसरातील काहींचा यात मृत्यू झाला आहे.

Comments
Add Comment

अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट पुरस्काराने गौरव

मुंबई : मराठीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळख प्राप्त करणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा ह्रदय सम्राट या

मुंबईतील वॉटर मेट्रोच्या काम लवकरात लवकर सुरू करावे : ना. नितेश राणे

वॉटर मेट्रोचा विकास आराखडा तीन महिन्याच्या आत सादर करण्याच्याही दिल्या सूचना मुंबई : मुंबईमध्ये पर्यायी वाहतूक

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुळकर्णी यांच्यावर विक्रोळीत अंत्यसंस्कार

मुंबई : हिंदुत्ववादी विचाराचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचे रविवारी विलेपार्ले येथे

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अद्ययावतीकरणासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करावे; बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून मंत्री नितेश राणेंचा सत्कार मुंबई : महाराष्ट्र सागरी

Bomb Threat: मुंबईतील दोन नामांकित शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी! शाळेच्या कॅम्पसची सुरक्षा वाढवली

मुंबईतील दोन नामांकित आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.  मुंबई: मुंबईतील दोन

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं, अंधेरी सब वे पाण्याखाली

मुंबईसह कोकणात धुमाकूळ! मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत मुंबई: उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे