भयानक अपघातातही प्रवाशाला वाचवणारी सीट क्रमांक 11A, २७ वर्षांपूर्वीही एक जण वाचला होता

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या AI 171 विमानाचा अपघात झाला. या अपघातात विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विमान जिथे कोसळले त्या भागातील काही नागरिकांचाही मृत्यू झाला. अपघातामुळे एकूण २७४ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात विमानात 11A या सीटवर बसलेल्या रमेश विश्वासकुमार यांचा जीव वाचला. ते अपघात झाला त्यावेळी आश्चर्यकारकरित्या विमानातून बाहेर फेकले गेले आणि वाचले.

याआधी २७ वर्षांपूर्वी १९९८ मध्ये थायलंडमध्ये विमान थाई एअरवेजच्या TG 261 विमानाला अपघात झाला होता. या अपघातात विमानातील १०१ जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे त्या विमानातील 11A या सीटवर बसलेल्या रुआंगसाक यांचा जीव वाचला होता. आता अहमदाबादमधील विमान अपघाताची बातमी समजली आणि फक्त 11A या सीटवर बसलेला प्रवासी वाचल्याचे कळले त्यावेळी रुआंगसाक यांच्या १९९८ च्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.

एखाद्या विमानात आपल्यासोबत असलेल्या सर्वांचा मृत्यू होतो आणि फक्त आपण वाचतो तेव्हा वाचल्याचा आनंद साजरा करावा आणि आपल्यासोबतचे सर्व कधीच दिसणार नाहीत याचे दुःख करत बसावे हेच समजत नाही. मन संभ्रमावस्थेत सापडते. असेच आधी रुआंगसाकचे आणि आता रमेशचे झाले आहे. याआधी १९८५ मध्ये नेवाडात एका विमान अपघातात एकटा जॉर्ज लॅमसन वाचला होता. त्याची पण वाचल्यानंतर काही दिवस गोंधळल्यासारखी स्थिती होतो.

 

 
Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला