सांगलीत ड्रगचा कारखाना चालवणाऱ्याला UAE मध्ये पकडले, भारतात आणले

नवी दिल्ली : भारतामध्ये महाराष्ट्रात सांगली येथे सिंथेटिक ड्रग तयार करण्याचा कारखाना चालवणारा ताहेर सलीम डोला हा वाँटेड आरोपी पोलीस शोधत असल्याचे लक्षात येताच यूएईला पळून गेला होता. त्याला यूएई येथे पकडण्यात आले. त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य युनिट, केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था अर्थात सीबीआय (Central Bureau of Investigation) आणि अबुधाबी येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी यांनी संयुक्त कारवाई करुन ताहेर सलीम डोला याला पकडले आहे.

भारताच्या रेड कॉर्नर नोटीसला प्रतिसाद देत यूएईमधून ताहेर सलीम डोलाला पकडण्यात आले आहे. पकडल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याचा ताबा भारताला मिळाला आहे. मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात ताहेर सलीम डोला विरोधात ड्रगचा कारखाना चालवल्याप्रकरणी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ताहेर सलीम डोला आणि इतरांशी संबंधित असलेल्या सांगलीच्या कारखान्यातून एकूण १२६.१४१ किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग (अमली पदार्थ) जप्त करण्यात आला आणि दोन हजार ५२२ लाख रुपये किमतीचे औषध जप्त करण्यात आले . ही कारवाई मुंबई पोलिसांनी सांगलीत जाऊन केली होती. कारवाई केल्यानंतर पोलिसांनी सीबीआयच्या मदतीने ताहेर सलीम डोला विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांत इंटरपोलच्या सहकार्याने भारताने १०० पेक्षा जास्त आरोपींना परदेशातून पकडून भारतात आणले आहे.
Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने