सांगलीत ड्रगचा कारखाना चालवणाऱ्याला UAE मध्ये पकडले, भारतात आणले

नवी दिल्ली : भारतामध्ये महाराष्ट्रात सांगली येथे सिंथेटिक ड्रग तयार करण्याचा कारखाना चालवणारा ताहेर सलीम डोला हा वाँटेड आरोपी पोलीस शोधत असल्याचे लक्षात येताच यूएईला पळून गेला होता. त्याला यूएई येथे पकडण्यात आले. त्याचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य युनिट, केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था अर्थात सीबीआय (Central Bureau of Investigation) आणि अबुधाबी येथील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी यांनी संयुक्त कारवाई करुन ताहेर सलीम डोला याला पकडले आहे.

भारताच्या रेड कॉर्नर नोटीसला प्रतिसाद देत यूएईमधून ताहेर सलीम डोलाला पकडण्यात आले आहे. पकडल्यानंतर अवघ्या काही तासांत त्याचा ताबा भारताला मिळाला आहे. मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात ताहेर सलीम डोला विरोधात ड्रगचा कारखाना चालवल्याप्रकरणी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ताहेर सलीम डोला आणि इतरांशी संबंधित असलेल्या सांगलीच्या कारखान्यातून एकूण १२६.१४१ किलो मेफेड्रोन (एमडी) ड्रग (अमली पदार्थ) जप्त करण्यात आला आणि दोन हजार ५२२ लाख रुपये किमतीचे औषध जप्त करण्यात आले . ही कारवाई मुंबई पोलिसांनी सांगलीत जाऊन केली होती. कारवाई केल्यानंतर पोलिसांनी सीबीआयच्या मदतीने ताहेर सलीम डोला विरोधात रेड कॉर्नर नोटीस काढली होती. मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांत इंटरपोलच्या सहकार्याने भारताने १०० पेक्षा जास्त आरोपींना परदेशातून पकडून भारतात आणले आहे.
Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी