Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या जोरदार पावसाने सोबत अनेक जलजन्य आजार आणलेत. या काळात सतत आर्द्रता आणि पाणी साचल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळं संसर्ग पसरण्याचा धोका वाढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टॉयफॉइड, कावीळ, तीव्र अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचं पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून समोर आलयं.


?si=z7MmqcdZ4LuJCPoq

पुण्यात यंदा जानेवारी महिन्यात दुषित अन्न व पाण्यातून गुलेन बॅरी सिड्रोम म्हणजे जीबीएस हा आजार पसरला होता. याची लागण झाल्यावर मेंदूविषयक गुंतागुंत होते. अतिसार व ओटीपोटात वेदना होतात. यामुळं महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला. अनेक उपाययोजना होती घेतल्या. शहरात पावसामुळं जागोजागी पाण्याची डबकी साचल्यानं दुषित व घाण पाणी साचून राहते. यामुळं आजारांना निमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात वाढलेल्या जलजन्य आजार वाढल्यानं सरकारी व खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा जानेवारी ते मे या महिन्यांत जलजन्य आजाराचे पाच हजार ६१७ रुग्र आढळले आहेत.



कोणत्या आजाराचे किती रुग्ण आढळले ते पाहूया.



१. तीव्र अतिसार : ४ हजार २९२ रुग्ण
२. कावीळ : ६६
३. आमांश : १०६
४. विषमज्वर : ८६
५. लेप्टोस्पारेसिस : २
६. जुलाब : ९७६
७. गॅस्टो : ९५



काय आहेत जलजन्य आजाराची लक्षणे ते पाहूया...



ताप येणे, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधे दुखणे


नागरिकांनी उलट्या,जुलाब विषमज्वर हे आजार झाल्यास तातडीने उपचार करून घ्यावेत. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांत हे उपचार उपलब्ध आहेत, असं आरोग्य विभागानं म्हटलयं.



 नागरिकांनी काय काळजी घ्यावी?



  • शुद्ध पाणी प्यावे. कूपनलिका, विहिर व कालव्याचे अशुद‌्ध पाणी पिऊ नये.

  • शिळे व माशा बसलेले अन्न खाऊ नये.

  • पाणी गाळून व २० मिनिटे उकळून व नंतर थंड करून प्यावे.

  • पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत. स्वच्छ करावेत.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा