Pune News : सावधान! पुण्यात जलजन्य आजारांचा धोका

कडक उन्हापासून दिलासा देणारा पावसाळा ऋतू. मात्र यंदा मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस धुमाकूळ घालतोय. पुण्यात या जोरदार पावसाने सोबत अनेक जलजन्य आजार आणलेत. या काळात सतत आर्द्रता आणि पाणी साचल्यामुळे बॅक्टेरिया आणि विषाणू वेगाने वाढतात. त्यामुळं संसर्ग पसरण्याचा धोका वाढलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टॉयफॉइड, कावीळ, तीव्र अतिसाराचे रुग्ण वाढत असल्याचं पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीवरून समोर आलयं.


?si=z7MmqcdZ4LuJCPoq

पुण्यात यंदा जानेवारी महिन्यात दुषित अन्न व पाण्यातून गुलेन बॅरी सिड्रोम म्हणजे जीबीएस हा आजार पसरला होता. याची लागण झाल्यावर मेंदूविषयक गुंतागुंत होते. अतिसार व ओटीपोटात वेदना होतात. यामुळं महापालिका आरोग्य विभाग सतर्क झाला. अनेक उपाययोजना होती घेतल्या. शहरात पावसामुळं जागोजागी पाण्याची डबकी साचल्यानं दुषित व घाण पाणी साचून राहते. यामुळं आजारांना निमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात वाढलेल्या जलजन्य आजार वाढल्यानं सरकारी व खासगी रुग्णालयात उपचारासाठी गर्दी वाढत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा जानेवारी ते मे या महिन्यांत जलजन्य आजाराचे पाच हजार ६१७ रुग्र आढळले आहेत.



कोणत्या आजाराचे किती रुग्ण आढळले ते पाहूया.



१. तीव्र अतिसार : ४ हजार २९२ रुग्ण
२. कावीळ : ६६
३. आमांश : १०६
४. विषमज्वर : ८६
५. लेप्टोस्पारेसिस : २
६. जुलाब : ९७६
७. गॅस्टो : ९५



काय आहेत जलजन्य आजाराची लक्षणे ते पाहूया...



ताप येणे, डोकेदुखी, उलट्या, जुलाब, ओटीपोटात दुखणे, सांधे दुखणे


नागरिकांनी उलट्या,जुलाब विषमज्वर हे आजार झाल्यास तातडीने उपचार करून घ्यावेत. महापालिकेच्या सर्व दवाखान्यांत हे उपचार उपलब्ध आहेत, असं आरोग्य विभागानं म्हटलयं.



 नागरिकांनी काय काळजी घ्यावी?



  • शुद्ध पाणी प्यावे. कूपनलिका, विहिर व कालव्याचे अशुद‌्ध पाणी पिऊ नये.

  • शिळे व माशा बसलेले अन्न खाऊ नये.

  • पाणी गाळून व २० मिनिटे उकळून व नंतर थंड करून प्यावे.

  • पाण्याचे साठे आठवड्यातून एकदा रिकामे करावेत. स्वच्छ करावेत.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी