विक्रांत मेस्सीला अहमदाबाद विमान अपघाताचा धक्का; म्हणाला, 'काकांचा मुलगा गमावल्याचं दुःख अधिक वेदनादायी'

मुंबई : अहमदाबादमधून लंडनला निघालेल्या एका विमानाला टेकऑफनंतर अवघ्या काही वेळातच भीषण अपघात झाल्याने देशभरात शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेत २६० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, ज्यात बीजे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. विमान थेट त्यांच्या वसतिगृहाच्या मेसवर कोसळले. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. विमानात प्रवासी आणि क्रू मेंबरसह २४२ लोक होते. विशेष म्हणजे, या विमानाचे पहिले अधिकारी (फर्स्ट ऑफिसर) क्लाईव्ह कुंदर हे अभिनेता विक्रांत मेस्सी यांच्या कुटुंबाचे मित्र होते.


विक्रांत मेस्सी या दुर्दैवी अपघातात आपल्या कुटुंबातील मित्राला गमावल्याने दुःखी आहे. 'माझ्या काकांनी त्यांचा मुलगा गमावला हे ऐकून मला आणखी वेदना होत आहेत,' असे त्याने म्हटले आहे.



अहमदाबादमधील या भीषण अपघातानंतर अभिनेता विक्रांत मेस्सीने सोशल मीडियावर आपलं दुःख व्यक्त केलं. त्याने सांगितलं की, विमानात पहिले अधिकारी म्हणून काम करणारे त्याचे कौटुंबिक मित्र या अपघातात मृत्युमुखी पडले आहेत.


विक्रांत मेस्सीने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे, 'आज अहमदाबादमध्ये झालेल्या या अकल्पनीय आणि दुःखद अपघातात ज्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि प्रियजनांसाठी माझं हृदय तुटतंय. मला हे जाणून आणखी वेदना होत आहेत की, माझे काका, क्लिफर्ड कुंदर, यांनी त्यांचा मुलगा क्लाईव्ह कुंदरला गमावले आहे. क्लाईव्ह कुंदर हे त्या दुर्दैवी विमानाचे पहिले अधिकारी होते. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला, काका, तसेच या घटनेने ज्यांना खोलवर धक्का बसला आहे, त्या सर्वांना शक्ती देवो.'

Comments
Add Comment

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.

मतदारांसाठी निवडणूक आयोगाचे नवे नियम; गरजेच्या किमान सुविधा देणे बंधनकारक

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे.