जिल्ह्यातील ६५४ गावांत राबविणार जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान

१५ जूनपासून जनजागृती मोहिमेला प्रारंभ


पालघर:आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक सशक्तिकरणासाठी केंद्र शासनाच्या वतीने 'प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत पालघर जिल्ह्यातील ६५४ गावांमध्ये १५ जून ते ३० जून २०२५ या कालावधीत विशेष जनजागृती मोहिम राबविण्यातयेणार आहे.


या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे आदिवासी बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ गावपातळीवर उपलब्ध करून देणे होय. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत विविध तालुक्यांतील गावांचा समावेश करण्यात आला आहे.


जव्हार १०७, मोखाडा ५३, विक्रमगड ९३, वाडा ८७, पालघर ९२, तलासरी ३७, डहाणू १६३ आणि वसई तालुक्यातील २२ गावांमध्ये ही जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या मोहिमेदरम्यान गावांमध्ये शिबीरे आयोजित करून नागरिकांना आधार कार्ड व आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, जात प्रमाणपत्र, पीएम किसान योजना व जनधन खाते उघडने, तसेच सिकलसेल आजारासंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.


याशिवाय आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, महसूल आदी विभागांमार्फत विविध लाभ योजना प्रत्यक्ष दिल्या जाणार आहेत.या अभियानामुळे आदिवासी समुदायाच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून येईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी व्यक्त केला असून, सर्व संबंधित विभागांनी मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

Comments
Add Comment

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही