Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 'ॲक्टीव्ह मोडवर'

मुंबईत 'या' तारखेपासून करणार उपोषणाला सुरुवात


मागील दोन वर्षांपासून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षण (Maratha Reservation) च्या  मुद्द्यावरुन सातत्याने आंदोलन उपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्थगित केलेलं उपोषण आता पुन्हा एकदा जरांगेंनी मनावर घेत सरकारविरोधात आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आता थेट मुंबई गाठून मुंबईत उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द जरांगे यांनी केली आहे.  येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. ते अंतरवली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलत होते.


मनोज जरांगे यांचं ठरलं


पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आमच्या लेकराबाळांचं जर वाटोळ होत असेल आता आम्ही शांत बसणार नाहीत. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यांचे पुरावे पोलिस पाटील, ग्रामपंचायत देवस्थानाकडे यासंदर्भातील पुरावे आढळून आलेले आहेत. त्यामुळे आता मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा कायदा सरकारने पारित करावा, आणि गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं. दरम्यान, आता कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही. सरकारकडे आता कारणच नाही मराठा समाजाने काय करायचं आता हे एक ऑगस्टला आपण सांगणार आहे.


29  ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषण करणार असून मराठा कुणबी एकच हा अध्यादेश अद्याप काढलेला नाही मागणीवर आम्ही ठाम आहोत. कायदा पारित करायचा असेल तर आम्हाला वेळ देण्याची मागणी गिरीश महाजनांनी केली होती, त्यानंतर आम्ही वेळ दिला. कायद्याला आधार लागतो असं महाजन म्हणत होते, ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत हे पुरावे खूप झाले आहेत आधारासाठी, असं मनोज जरांगे यांनी पुढे म्हंटले आहे.
Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा