Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 'ॲक्टीव्ह मोडवर'

  57

मुंबईत 'या' तारखेपासून करणार उपोषणाला सुरुवात


मागील दोन वर्षांपासून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षण (Maratha Reservation) च्या  मुद्द्यावरुन सातत्याने आंदोलन उपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्थगित केलेलं उपोषण आता पुन्हा एकदा जरांगेंनी मनावर घेत सरकारविरोधात आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आता थेट मुंबई गाठून मुंबईत उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द जरांगे यांनी केली आहे.  येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. ते अंतरवली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलत होते.


मनोज जरांगे यांचं ठरलं


पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आमच्या लेकराबाळांचं जर वाटोळ होत असेल आता आम्ही शांत बसणार नाहीत. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यांचे पुरावे पोलिस पाटील, ग्रामपंचायत देवस्थानाकडे यासंदर्भातील पुरावे आढळून आलेले आहेत. त्यामुळे आता मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा कायदा सरकारने पारित करावा, आणि गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं. दरम्यान, आता कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही. सरकारकडे आता कारणच नाही मराठा समाजाने काय करायचं आता हे एक ऑगस्टला आपण सांगणार आहे.


29  ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषण करणार असून मराठा कुणबी एकच हा अध्यादेश अद्याप काढलेला नाही मागणीवर आम्ही ठाम आहोत. कायदा पारित करायचा असेल तर आम्हाला वेळ देण्याची मागणी गिरीश महाजनांनी केली होती, त्यानंतर आम्ही वेळ दिला. कायद्याला आधार लागतो असं महाजन म्हणत होते, ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत हे पुरावे खूप झाले आहेत आधारासाठी, असं मनोज जरांगे यांनी पुढे म्हंटले आहे.
Comments
Add Comment

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक नियंत्रणासाठी 'एआय'चा वापर

रायगड (प्रतिनिधी): गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर लाखो कोकणवासीय आपल्या गावांकडे धाव घेतात. त्यामुळे

सिंधुदुर्ग : कार ऑन रेल सेवेने पाचपैकी चार वाहने नांदगावला उतरली

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वेची पहिली कार ऑन ट्रेन कोलाड (जि. रायगड) स्थानकावरून निघाली आणि रात्री नांदगाव (जि.

आता २९ ऑगस्टला फाईट, चलो मुंबई; जरांगेंचा इशारा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर येतोय, असा इशारा मनोज जरांगे यांनी

अवघे 2 दिवस बाकी कोकणच्या बाप्पाची ओढ, 'मोदी एक्सप्रेस' निघाली गावाला

गणेशोत्सव आणि कोकण या नात्याची, आपुलकीची, श्रद्धेची माहिती सांगण्याची आवश्यकता नाही, गणपती म्हटलं की कोणत्याही

गणपतीआधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची तातडीची बैठक, भाजपचं मिशन बीएमसी सुरू

येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी भाजपने आतापासून कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही राज्याच्या