Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा 'ॲक्टीव्ह मोडवर'

मुंबईत 'या' तारखेपासून करणार उपोषणाला सुरुवात


मागील दोन वर्षांपासून मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षण (Maratha Reservation) च्या  मुद्द्यावरुन सातत्याने आंदोलन उपोषण करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच स्थगित केलेलं उपोषण आता पुन्हा एकदा जरांगेंनी मनावर घेत सरकारविरोधात आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे आता थेट मुंबई गाठून मुंबईत उपोषण सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द जरांगे यांनी केली आहे.  येत्या 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे उपोषणाला बसणार आहेत. ते अंतरवली सराटीतून पत्रकार परिषदेत बोलत होते.


मनोज जरांगे यांचं ठरलं


पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आमच्या लेकराबाळांचं जर वाटोळ होत असेल आता आम्ही शांत बसणार नाहीत. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत. त्यांचे पुरावे पोलिस पाटील, ग्रामपंचायत देवस्थानाकडे यासंदर्भातील पुरावे आढळून आलेले आहेत. त्यामुळे आता मराठा आणि कुणबी हे एकच असल्याचा कायदा सरकारने पारित करावा, आणि गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ ऑगस्टला मुंबईत उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केलीयं. दरम्यान, आता कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही. सरकारकडे आता कारणच नाही मराठा समाजाने काय करायचं आता हे एक ऑगस्टला आपण सांगणार आहे.


29  ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषण करणार असून मराठा कुणबी एकच हा अध्यादेश अद्याप काढलेला नाही मागणीवर आम्ही ठाम आहोत. कायदा पारित करायचा असेल तर आम्हाला वेळ देण्याची मागणी गिरीश महाजनांनी केली होती, त्यानंतर आम्ही वेळ दिला. कायद्याला आधार लागतो असं महाजन म्हणत होते, ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत हे पुरावे खूप झाले आहेत आधारासाठी, असं मनोज जरांगे यांनी पुढे म्हंटले आहे.
Comments
Add Comment

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत

Ladki Bahin Yojna : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेच्या ४० लाख महिला अपात्रतेच्या उंबरठ्यावर?

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक