बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे. यासंदर्भात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे दि. ११ जून रोजी कारवाई करुन बनावट खतांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी संदीप यमाजी जाधव रा. पाथरे खुर्द याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, १९८५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.


अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना १० जून, २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली की,पाथरे खुर्द येथील चैतन्य हार्डवेअर (वळण रोड, पाथरे खुर्द) मध्ये विनापरवाना खतांचा साठा असून त्यांची विक्री केली जात आहे. या गुप्त माहितीच्या आधारे, राहुल ढगे यांनी राहुरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब अण्णासाहेब शिंदे आणि कृषी अधिकारी गणेश नारायण अनारसे यांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथील गोदामात विक्रीसाठी ठेवलेल्या ५० किलोच्या गोण्या, १० किलोच्या बादलीतील खते आणि १ लिटर मधील द्रव खते मोठ्या प्रमाणात आढळून आली.


संदीप यमाजी जाधव, वय ४२ वर्षे, रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी, याची चौकशी केली असता, त्याच्याकडे खते विक्री आणि साठवणुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. तसेच त्याने खत खरेदीची बिले किंवा साठा नोंद वही (पुस्तक) यासारखी कोणतीही आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. या कारवाईत एकूण रु. ७ लाख ४९ हजार ७३० रुपए किमतीचा खतांचा साठा जप्त करण्यात आला. ज्यात विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचा समावेश आहे.संदीप यमाजी जाधव याने विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने खतांचा साठा करून त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले असून हा साठा इतरत्र हलवू नये, अशा सूचना देण्यात आल्या. पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ

Ajit Pawar : विमान अपघाताआधी अजित पवारांनी सुनेत्रा वहिनींच्या नातलगाला केलेला शेवटचा फोन... काय होते अजित पवारांचे शेवटचे शब्द

धाराशिव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या संदर्भात एक नवी

Eknath Shinde: कोकणात प्रदूषणकारी कंपन्यांना थारा नाही; जनतेच्या आरोग्याशी खेळ होऊ देणार नाही!

लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘मितेनी’–‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ कंपनीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट

अजित पवारांचा अपघात झालेल्या 'व्हीएसआर व्हेंचर' विमान कंपनीचे ऑडिट करा; 'डीजीसीए'चे आदेश

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या घटनेच्या तपासाला गती देण्यात आली असून, नागरी

Nilesh Rane and Sanjay Raut : एवढा नीचपणा बरा नव्हे...घरातला कर्ता माणूस गेलाय ओ, निलेश राणेंनी बारामतीतून राऊतांचे काढले वाभाडे

बारामती : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघातावरून राज्यात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अजित पवार

Sunetra Pawar : अजितदादांचा वारसा आता सुनेत्रा वहिनींच्या हाती! पुण्याच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारचं; परिपत्रक जारी

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा