बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे. यासंदर्भात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे दि. ११ जून रोजी कारवाई करुन बनावट खतांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी संदीप यमाजी जाधव रा. पाथरे खुर्द याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, १९८५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.


अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना १० जून, २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली की,पाथरे खुर्द येथील चैतन्य हार्डवेअर (वळण रोड, पाथरे खुर्द) मध्ये विनापरवाना खतांचा साठा असून त्यांची विक्री केली जात आहे. या गुप्त माहितीच्या आधारे, राहुल ढगे यांनी राहुरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब अण्णासाहेब शिंदे आणि कृषी अधिकारी गणेश नारायण अनारसे यांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथील गोदामात विक्रीसाठी ठेवलेल्या ५० किलोच्या गोण्या, १० किलोच्या बादलीतील खते आणि १ लिटर मधील द्रव खते मोठ्या प्रमाणात आढळून आली.


संदीप यमाजी जाधव, वय ४२ वर्षे, रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी, याची चौकशी केली असता, त्याच्याकडे खते विक्री आणि साठवणुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. तसेच त्याने खत खरेदीची बिले किंवा साठा नोंद वही (पुस्तक) यासारखी कोणतीही आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. या कारवाईत एकूण रु. ७ लाख ४९ हजार ७३० रुपए किमतीचा खतांचा साठा जप्त करण्यात आला. ज्यात विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचा समावेश आहे.संदीप यमाजी जाधव याने विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने खतांचा साठा करून त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले असून हा साठा इतरत्र हलवू नये, अशा सूचना देण्यात आल्या. पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comments
Add Comment

थंडी संपताच महाराष्ट्रात जाणवू लागलाय उन्हाचा तडाखा

मुंबई : थंडी सरत आली आहे. आणि हवामानात बदल जाणवायला लागला आहे. मार्च मधल्या आल्हाददायक वातावरणात उकाडा जाणवायला

CH. SAMBHAJINAGAR : MGM Hospital परिसरात नायजेरियन तरुणांकडून महिलेची छेडछाड आणि मारहाण

छत्रपती संभाजीनगर: शहरातील MGM Hospital परिसरात एका महिलेची छेडछाड व मारहाण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या

Malegaon Namaz Pathan : मालेगाव मनपा कार्यालयात नमाज पठण, सात जणांवर गुन्हा दाखल

मालेगाव महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये नमाज पडल्याप्रकरणी सात जणांवरती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस