बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

  90

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे. यासंदर्भात राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात कृषी विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे दि. ११ जून रोजी कारवाई करुन बनावट खतांचा मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी संदीप यमाजी जाधव रा. पाथरे खुर्द याच्या विरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ आणि रासायनिक खते (नियंत्रण) आदेश, १९८५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.


अहिल्यानगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा खत निरीक्षक निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना १० जून, २०२५ रोजी गुप्त माहिती मिळाली की,पाथरे खुर्द येथील चैतन्य हार्डवेअर (वळण रोड, पाथरे खुर्द) मध्ये विनापरवाना खतांचा साठा असून त्यांची विक्री केली जात आहे. या गुप्त माहितीच्या आधारे, राहुल ढगे यांनी राहुरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब अण्णासाहेब शिंदे आणि कृषी अधिकारी गणेश नारायण अनारसे यांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथील गोदामात विक्रीसाठी ठेवलेल्या ५० किलोच्या गोण्या, १० किलोच्या बादलीतील खते आणि १ लिटर मधील द्रव खते मोठ्या प्रमाणात आढळून आली.


संदीप यमाजी जाधव, वय ४२ वर्षे, रा. पाथरे खुर्द, ता. राहुरी, याची चौकशी केली असता, त्याच्याकडे खते विक्री आणि साठवणुकीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. तसेच त्याने खत खरेदीची बिले किंवा साठा नोंद वही (पुस्तक) यासारखी कोणतीही आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. या कारवाईत एकूण रु. ७ लाख ४९ हजार ७३० रुपए किमतीचा खतांचा साठा जप्त करण्यात आला. ज्यात विविध प्रकारच्या कृषी उत्पादनांचा समावेश आहे.संदीप यमाजी जाधव याने विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने खतांचा साठा करून त्यांची विक्री केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांना विक्री बंद करण्याचे आदेश बजावण्यात आले असून हा साठा इतरत्र हलवू नये, अशा सूचना देण्यात आल्या. पुढील तपास राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.