मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षाच

  59

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मेट्रो-३ मार्गिकवरील प्रवासी संख्या बऱ्यापैकी वाढेल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) होता; परंतु दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन एक महिना पूर्ण झाला तरी दैनंदिन प्रवासी संख्येत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. या मार्गिकेवर दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या आसपास आहे.


प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक नसून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आता एमएमआरसीने थेट खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, कोणते पर्याय स्वीकारता येतील याचा अभ्यास करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरसीने निविदा मागविल्या आहेत.



एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो-३ मार्गिकेचे काम करीत आहे. यातील आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे, तर महिन्याभरापूर्वी १० मे रोजी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आरे-बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करताना या मार्गिकेवरून अंदाजे चार लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र या टप्प्याला प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.


त्यामुळेच या मार्गिकेवरून दिवसाला अवघे २० हजार प्रवासी प्रवास करीत होते. या मार्गिकेतील बीकेसी–आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा एमएमआरसीला होती. त्यानुसार प्रवासी संख्येत काहीशी वाढ झाली आहे. मात्र ही वाढ मोठी, समाधानकारक नाही. यासाठी एमएमआरसीने नुकत्याच इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.

Comments
Add Comment

Tahawwur Rana : हो, २६/११ हल्ला झाला तेव्हा मी पाकिस्तानचा विश्वासू एजंट होतो... मास्टरमाइंड तहव्वुर राणाची कबुली

मुंबई: २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वुर राणा याने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

मुंबईतील ५१ कबुतरखान्यांवर बंदी

मुंबई : मुंबईची ओळख असलेले सर्व 'कबुतर खाने' आता बंद होणार आहेत. मुंबई आणि कबुतर खाने हे एक जुनं समीकरण. मात्र आता

Sanjay Shirsat Vits Hotel Controversy : संजय शिरसाटांवर 'व्हिट्स हॉटेल' प्रकरणावरुन सभागृहात गंभीर आरोप, मुख्यमंत्री फडणवीसांनी लावली तातडीनं उच्चस्तरीय चौकशी

मुंबई : आज विधान परिषदेत अंबादास दानवे यांनी संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी नियम डावलून टेंडर

'त्या' निशिकांत दुबेंना समज द्या, अन्यथा.... मंत्री योगेश कदम यांनी घेतला आक्षेप

मुंबई: भाजपाचे ज्येष्ठ खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी भाषिकांविरोधात केलेल्या वादग्रस्त

दुसऱ्या राज्यात भाषेवरुन मराठी माणसांना मारलं तर ? हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई : मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाला मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ

Thackeray Brothers VS BJP : दोन काय चार भाऊ एकत्र आले तरी आम्ही तयार, भाजपच्या प्रसाद लाड यांचं ठाकरे बंधूंना खुले आव्हान

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख राज ठाकरे हे एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय