मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षाच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर मेट्रो-३ मार्गिकवरील प्रवासी संख्या बऱ्यापैकी वाढेल, असा विश्वास मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनला (एमएमआरसी) होता; परंतु दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होऊन एक महिना पूर्ण झाला तरी दैनंदिन प्रवासी संख्येत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. या मार्गिकेवर दैनंदिन प्रवासी संख्या ५० हजारांच्या आसपास आहे.


प्रवाशांचा प्रतिसाद समाधानकारक नसून प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आता एमएमआरसीने थेट खासगी संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी संख्या वाढविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, कोणते पर्याय स्वीकारता येतील याचा अभ्यास करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यासाठी एमएमआरसीने निविदा मागविल्या आहेत.



एमएमआरसी ३३.५ किमी लांबीच्या मेट्रो-३ मार्गिकेचे काम करीत आहे. यातील आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे, तर महिन्याभरापूर्वी १० मे रोजी बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. आरे-बीकेसी टप्पा वाहतूक सेवेत दाखल करताना या मार्गिकेवरून अंदाजे चार लाख प्रवासी प्रवास करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र या टप्प्याला प्रवाशांचा हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.


त्यामुळेच या मार्गिकेवरून दिवसाला अवघे २० हजार प्रवासी प्रवास करीत होते. या मार्गिकेतील बीकेसी–आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक असा दुसरा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा एमएमआरसीला होती. त्यानुसार प्रवासी संख्येत काहीशी वाढ झाली आहे. मात्र ही वाढ मोठी, समाधानकारक नाही. यासाठी एमएमआरसीने नुकत्याच इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागविल्या आहेत.

Comments
Add Comment

कुंभमेळ्यासाठी झटपट पटापट भटजी व्हा फटाफट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कौशल्य विकास विभागाकडून पूजाविधी आणि पौराहित्य शॉर्ट टर्म कोर्सला

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; ठाण्यात भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क उभारणार

मुंबई : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल

महसूल विभागाचे ३ महत्वाचे निर्णय, शेतकऱ्यांना होणार फायदा; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

मुंबई : महसूल विभागाने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक असे तीन महत्त्वाचे निर्णय घेतले असून

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटींची मदत - वर्षभरातील कामगिरी; मदतीचा ओघ वाढवण्यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्य योजनांचे एकत्रीकरण

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षात गेल्या वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सर्व

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस