शहापुरातील शेतकऱ्यांना तीन महिने पैसे नाहीत

  120

शेतकरी आर्थिक संकटात


शहापूर : तालुक्यातील भात उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. कारण, त्यांनी शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर धान्यविक्री करून दोन ते तीन महिने उलटले असतानाही त्यांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.


यावर्षी शासनाने धान्याला हमीभाव देत बोनसचीही घोषणा केली होती, त्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत अधिक दर मिळेल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर आपले भात पोहोचवले. परंतु या खरेदी प्रक्रियेनंतरही तब्बल १ हजार ५०० शेतकऱ्यांना ना मूळ विक्री रक्कम मिळाली आहे, ना बोनस.


परिणामी बियाणे, खते, मशागत यांसाठी लागणारा खर्च करणे शेतकऱ्यांना अशक्य होत चालले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस आणि मान्सूनचे आगमन झाल्यामुळे खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, खात्रीशीर उत्पन्नाच्या अभावी आणि थकीत रक्कम न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अडचणीत आणणारी झाली आहे. ट्रॅक्टर भाड्याने घेणे, बियाणे खरेदी करणे, खते मिळवणे यासाठी पैशांची नितांत गरज आहे. पण बँकांच्या दारात फेऱ्या मारूनही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी शासनाने दोन हेक्टरपर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २० हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे.


हमीभाव २ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल निश्चित करण्यात आला असून बाजार भावाच्या तुलनेत हा पर्याय नक्कीच चांगला वाटतो. पण जेव्हा मूळ विक्री रक्कमच शेतकऱ्यांना वेळेत मिळत नाही, तेव्हा बोनस फक्त कागदावरच उरतो, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाकडून बोनस जाहीर करण्यात आला. परंतु प्रत्यक्षात त्याचा लाभ शेतकऱ्यांच्या हाती केव्हा पडणार, याचा काही अंदाज नसल्याचे ॲड. प्रशांत घोडविंदे यांनी सांगितले.


लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत रक्कम जमा करावी आणि बोनसही वितरित करावा. अन्यथा खरिपाची तयारी करणे कठीण होईल आणि शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर जाईल. यावर्षी हवामान बदलामुळे आधीच पीक नुकसान झाले आहे, त्यात शासन वेळेवर पैसे देत नसेल, तर शेतकऱ्यांचा शासनावरचा विश्वास पूर्णपणे ढासळेल. त्यामुळे शासनाने आणि संबंधित यंत्रणांनी याची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे, असे भात उत्पादक शेतकरी भगवान सांबरे यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या