वंदे भारत एक्स्प्रेसने काश्मीरची सफर आता फक्त ३ तासांत

  63

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ जून रोजी काश्मीरसाठी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आणि ७ जूनपासून ही ट्रेन नियमितपणे सुरू झाली आहे. ही वेगवान वंदे भारत एक्स्प्रेस श्री माता वैष्णो देवी कटरा स्थानकावरून श्रीनगरपर्यंत धावते. या मार्गामध्ये केवळ बनिहाल येथे एकमेव थांबा आहे आणि संपूर्ण प्रवास फक्त ३ तासांत पूर्ण होतो.



जर तुम्ही वंदे भारत एक्स्प्रेसने काश्मीरला जाण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम तुम्हाला आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन (www.irctc.co.in) एसव्हीडीके ते सिना या स्टेशन कोडनुसार तिकीट बुक करावे लागेल. हे अनुक्रमे कटरा व श्रीनगरसाठीचे कोड आहेत. तुम्हाला तारीख निवडून ट्रेनची यादी पाहायला मिळेल. त्यानंतर AVL (Available) असलेल्या ट्रेनवर क्लिक करून प्रवास तपशील तपासावा. तुमचे नाव, वय, मोबाईल क्रमांक व अन्य आवश्यक माहिती भरून, UPI/कार्डद्वारे पेमेंट करून तिकीट बुक करता येते. पहिली ट्रेन – कटरा येथून सकाळी ८.१० वाजता सुटते आणि ११.१० वाजता श्रीनगर येथे पोहोचते.

जम्मू-काश्मीरमध्ये आता एकूण ४ वंदे भारत ट्रेन


दिल्लीहून कटऱ्यापर्यंत दोन वंदे भारत ट्रेन चालतात. या व्यतिरिक्त, आता कटडा ते श्रीनगरदरम्यानही दोन वंदे भारत ट्रेन उपलब्ध असल्याने जम्मू-काश्मीरमध्ये
एकूण चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत.

दिल्ली ते कटरा प्रवासाला सुमारे ८ तास आणि कटरा ते श्रीनगर प्रवासाला फक्त ३ तास लागतात. त्यामुळे आता प्रवाशांसाठी जम्मू-काश्मीरचा प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर झाला आहे.
Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही