शाळांच्या वेळापत्रकात बदल; आता शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता

  111

पुणे : पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळा येत्या १६ जूनपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनी शाळा सुरू होण्यापूर्वी तयारी सुरू केली आहे. शाळेसाठी नवीन दप्तर, वॉटर बॉटल, वह्या, पुस्तक खरेदी करणं सध्या सुरू आहे. अशातच शाळांच्या वेळापत्रकाबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळांचे वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता शाळा सकाळी सात ऐवजी ९ वाजता सुरू होणार आहे.



महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळांबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ ची सुरूवात येत्या १६ जूनपासून होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून शाळांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शाळा सकाळी ७ ऐवजी ९ वाजता भरतील आणि सायंकाळी ४ वाजता सुटतील. म्हणजेच सकाळी ९ ते सायंकाळी ४ ही शाळेची वेळ असणार आहे.


शाळांच्या नव्या वेळापत्रकानुसार, सकाळी ९ वाजल्यापासून ते ९.२५ पर्यंत परिपाठ राहिल. ९.२५ ते ११.२४ पर्यंत सुरूवातीचे ३ लेक्चर होतील. ११.२५ पासून ते ११.३५ पर्यंत १० मिनिटांची छोटी सुट्टी असेल. ११.३५ ते १२.५० पर्यंत दोन लेक्चर होतील. १२.५० ते १.३० वाजेपर्यंत मधली सुट्टी होईल. त्यानंतर १.३० ते ३.५५ वाजेपर्यंत उर्वरित लेक्चर होतील. त्यानंतर शेवटच्या ५ मिनिटांमध्ये वंदे मारतम होईल आणि शाळा सुटतील.


दरम्यान, राज्यामध्ये लवकरच शाळांच्या घंटा वाजणार आहे. उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या असून आता लवकरच शाळा सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची शाळा  ९ जूनपासून  सुरू झाल्या आहेत . राज्यातील ११ जिल्हे वगळता सगळीकडे शाळा १६ जूनपासून सुरू होणार आहेत. विदर्भामध्ये इतर विभागांच्या तुलनेत थोड्या उशिराने शाळा सुरू केल्या जातात.

Comments
Add Comment

बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे.

Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील मनोविकारतज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. नितीन अभिवंत यांचे हिमालयातील

Rainy Season Picnic : पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू!

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके,

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल, तर खबरदार!

मनसेविरोधात संतप्त वृत्तपत्र विक्रेत्यांची ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने ठाणे : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या

मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने

आषाढी यात्रेसाठी एसटीकडून ५,२०० विशेष बसचे नियोजन

पंढरपूर :आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक