चार्जिंग स्टेशनअभावी एनएमएमटीचा बोजवारा

  45

केवळ चारच ठिकाणी चार्जिंग स्टेशन


तुर्भे : पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एनएमएमटीच्या वतीने इलेक्ट्रिक गाड्यांना प्राध्यान्य दिले जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कल आहे. या बससाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र तो धूळखात पडून आहे. त्यामुळे अपुऱ्या चार्जिंग स्टेशनअभावी चार्जिंगची गैरसोय होत आहे. त्यातच चार्जिंगसाठी बराच वेळ लागत असल्याने अन्य गाड्यांतून प्रवाशांना पुढील प्रवास पूर्ण करावा लागत आहे.



सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात ५० टक्के इलेक्ट्रिक बसेस आहेत, मात्र चार्जिंग स्टेशन फक्त चारच ठिकाणी आहेत. घणसोली, तुर्भे आगाराबरोबर वाशी रेल्वे आणि नेरूळ येथील बसस्थानकात चार्जिंगसाठी स्टेशन उभारण्यात आलेली आहेत. जवळच्या मार्गावर या बसेस चालवताना चार्जिंग संपण्याअगोदर त्या आगारात पाठविल्या जातात.

२१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव


बस चार्जिंगसाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार होती, मात्र हे चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनची उभारणी होऊ शकलेली नाही. आतापर्यंत शहरात केवळ चार चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. अपुऱ्या चार्जिंग स्टेशन अभावी गाड्यांना चार्जिंग करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या चार्जिंगअभावी अर्ध्या प्रवासात बंद पडत आहेत.
Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या