चार्जिंग स्टेशनअभावी एनएमएमटीचा बोजवारा

  42

केवळ चारच ठिकाणी चार्जिंग स्टेशन


तुर्भे : पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एनएमएमटीच्या वतीने इलेक्ट्रिक गाड्यांना प्राध्यान्य दिले जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कल आहे. या बससाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र तो धूळखात पडून आहे. त्यामुळे अपुऱ्या चार्जिंग स्टेशनअभावी चार्जिंगची गैरसोय होत आहे. त्यातच चार्जिंगसाठी बराच वेळ लागत असल्याने अन्य गाड्यांतून प्रवाशांना पुढील प्रवास पूर्ण करावा लागत आहे.



सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात ५० टक्के इलेक्ट्रिक बसेस आहेत, मात्र चार्जिंग स्टेशन फक्त चारच ठिकाणी आहेत. घणसोली, तुर्भे आगाराबरोबर वाशी रेल्वे आणि नेरूळ येथील बसस्थानकात चार्जिंगसाठी स्टेशन उभारण्यात आलेली आहेत. जवळच्या मार्गावर या बसेस चालवताना चार्जिंग संपण्याअगोदर त्या आगारात पाठविल्या जातात.

२१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव


बस चार्जिंगसाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार होती, मात्र हे चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनची उभारणी होऊ शकलेली नाही. आतापर्यंत शहरात केवळ चार चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. अपुऱ्या चार्जिंग स्टेशन अभावी गाड्यांना चार्जिंग करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या चार्जिंगअभावी अर्ध्या प्रवासात बंद पडत आहेत.
Comments
Add Comment

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या

सॅनिटरी नॅपकिन बनवणारी मशीन भंगारमध्ये

सहा वर्षे धूळ खात पडून भाईंदर : महिलांच्या मासिक पाळी काळात स्वच्छता वाढवण्यासाठी तसेच महिलांना रोजगार उपलब्ध