चार्जिंग स्टेशनअभावी एनएमएमटीचा बोजवारा

केवळ चारच ठिकाणी चार्जिंग स्टेशन


तुर्भे : पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी एनएमएमटीच्या वतीने इलेक्ट्रिक गाड्यांना प्राध्यान्य दिले जात आहे. त्यानुसार इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याकडे नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा कल आहे. या बससाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता, मात्र तो धूळखात पडून आहे. त्यामुळे अपुऱ्या चार्जिंग स्टेशनअभावी चार्जिंगची गैरसोय होत आहे. त्यातच चार्जिंगसाठी बराच वेळ लागत असल्याने अन्य गाड्यांतून प्रवाशांना पुढील प्रवास पूर्ण करावा लागत आहे.



सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात ५० टक्के इलेक्ट्रिक बसेस आहेत, मात्र चार्जिंग स्टेशन फक्त चारच ठिकाणी आहेत. घणसोली, तुर्भे आगाराबरोबर वाशी रेल्वे आणि नेरूळ येथील बसस्थानकात चार्जिंगसाठी स्टेशन उभारण्यात आलेली आहेत. जवळच्या मार्गावर या बसेस चालवताना चार्जिंग संपण्याअगोदर त्या आगारात पाठविल्या जातात.

२१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव


बस चार्जिंगसाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार होती, मात्र हे चार्जिंग स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तीन वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यामुळे चार्जिंग स्टेशनची उभारणी होऊ शकलेली नाही. आतापर्यंत शहरात केवळ चार चार्जिंग स्टेशन उपलब्ध आहेत. अपुऱ्या चार्जिंग स्टेशन अभावी गाड्यांना चार्जिंग करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्या चार्जिंगअभावी अर्ध्या प्रवासात बंद पडत आहेत.
Comments
Add Comment

बारामती विमान अपघातात पीएसओ विदीप जाधव यांचा मृत्यू

ठाणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला. याच

अंबरनाथ शहरात घरपट्टी थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू

अंबरनाथ : शहरातील मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांना अंबरनाथ नगर परिषद प्रशासनाने अभय योजना राबविण्याचा

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी

कडोंमपात सेना-भाजपचे सूत्र ठरले!

शिवसेनेच्या नेत्याने सर्व संभ्रम दूर केले कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीत

'आनंद दिघेंचे स्वप्न पूर्ण करत आहोत, ठाणे महापालिकेवर भगवा कायम फडकत राहील'

ठाणे : आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी

ठाण्यात १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात

विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार ठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा