Vande Bharat : कोल्हापूरकरांनो तुमच्यासाठी खुशखबर! कोल्हापूर-मुंबई दरम्यान १५ दिवसांत वंदे भारत ट्रेन धावणार!

कोल्हापूर : पुणे-कोल्हापूर या दरम्यान धावणारी वंदे भारत आता मुंबईपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत तशी मागणी करण्यात आली होती. या मागणीला आता सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, येत्या १५ दिवसांत ती टर्मिनसवरून धावण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.



सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत ट्रेन सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी ३ दिवस धावते. हीच ट्रेन पुण्यापर्यंत धावत असल्याने व्यापारी, प्रवासी, नोकरदार वर्गाची ती मुंबईपर्यंत सोडण्यात यावी, अशी मागणी होत होती. रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे सोडण्यात यावी, अशी पुन्हा मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच ती सकाळी मुंबईला सोडण्यात यावी, असेही सांगितले. बियाणी म्हणाले, 'टर्मिनसवरून नवीन वंदे भारत थेट मुंबईपर्यंत धावणार आहे.


खासदार धनंजय महाडिक यांनीही त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याचा परिणाम म्हणून ही रेल्वे मंजूर झाली आहे. लवकरच गाडीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.' त्यामुळे पुढील १५ दिवसांत मुंबई-कोल्हापूर यादरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत सध्या धावत आहे. तिचे उद्‌घाटन १६ सप्टेंबर २०२४ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले. ती सोमवार, गुरुवार व शनिवार अशी तीन दिवस धावते. ती मिनी वंदे भारत २.० प्रकारातील असून, तिला एकूण ८ डबे असून तिची प्रवासी क्षमता ५५० इतकी असणार आहे. त्यात एसी चेअर कार व एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कार या दोन प्रकारांच्या डब्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा