पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर!

  60

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ‘एनडीए’च्या ११ वर्षांचा गौरव


मुंबई : काँग्रेस काळातील घोटाळ्यांनी बेजार झालेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. २०१४ पूर्वी अकराव्या क्रमांकावर असणाऱ्या भारताने नुकतेच चौथ्या क्रमांकावर झेप घेतली. लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल. मोदीजींच्या नेतृत्वात भारत आर्थिक महासत्तेच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचे कौतुकोद्गार शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.


बाळासाहेब भवन येथे आज अमरावती जिल्ह्यातील उबाठा पक्षाचे बडनेराचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. पक्ष प्रवेशावेळी शिवसेना नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ, जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री आशिष जयस्वाल , विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, आमदार दिपक केसरकर, आमदार बाबूराव कदम, आमदार अमोल खताळ, सचिव मा आमजार कॅप्टन अभिजित अडसूळ आदि उपस्थित होते.


केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार (एनडीए) आणि पंतप्रधानपदाला ११ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे यांनी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून शिवसेना विश्वासू घटक पक्ष म्हणून ‘एनडीए’ सोबत राहिली. आजही पंतप्रधान मोदीजींसोबत शिवसेना खंबीरपणे उभी आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली, त्यापूर्वी देशात काँग्रेसच्या घोटाळ्यांची मालिका सुरु होती. चारा घोटाळा, कोळसा घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळ्यांनी अर्थव्यवस्था खिळखिळी झाली होती. मात्र मागील ११ वर्षांत मोदींजींवर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही, ही वस्तुस्थिती आहे. याकाळात मोदीजींनी भारताला विश्वगुरु करण्याचा प्रयत्न केला, त्याचा सार्थ अभिमान असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. भारताने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर य़शस्वीपणे यान उतरण्याची किमया करुन दाखवली, आता मंगळावर जाण्याची तयारी सुरु आहे. एकीकडे विकास तर दुसरीकडे अवकाश तंत्रज्ञानातील ऐतिहासिक कामगिरी करुन भारताची महासत्तेच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.



ते पुढे म्हणाले की, २०१४ पूर्वी तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी युद्ध झाल्यास भारत १० दिवसांहून अधिक काळ तग धरु शकत नाही, अशी कबुली दिली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. मोदीजींनी भारताला संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनवलं. भारतात युद्धनौका बनवली, ब्राम्होस क्षेपणास्त्र तयार केले. टाटा समूहासोबत आता भारतातच राफेल विमाने तयार होणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर मोदीजी यांनी नवा भारत काय असतो, हे पाकिस्तानला घरात घुसून मारले आणि दहशतवाद्यांना जशास तसा धडा शिकवला. नव्या भारतात देशाच्या सुरक्षेबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, हे मोदीजींनी दाखवून दिले. ऑपरेशन सिंदूरमधून जगाला ब्राम्होस क्षेपणास्त्राची ताकद दाखवली. काँग्रेसने कायम व्होट बँकेचे राजकारण केले तर मोदीजींनी विकासाचं आणि देशभक्तीचे राजकारण केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.


काँग्रेसच्या ५० वर्षांच्या काळात पायाभूत सुविधा, विमानतळं, रेल्वे, रस्ते, पोर्ट यांची कामे झाली नाहीत. मात्र २०१४ मध्ये ७४ विमानतळे होती आता १४१ विमानतळे सुरु आहेत. मोदींजींच्या पाठिंब्यामुळेच महाराष्ट्राला १० वर्षात केंद्र सरकारकडून १० लाख कोटींचा निधी मिळाला,असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. काँग्रेसने इतकी वर्ष गरिबी हटावचा नारा दिला पण गरिबी हटली नाही गरिब मात्र हटला, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. मात्र मागील १० वर्षात २७ कोटी लोकांना दारिद्ररेषेवर आणले, ८० कोटी लोकांना मोफत रेशन देण्याचा निर्णय घेतला. कल्याणकारी योजनांमधून अन्न, वस्त्र, निवारा देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदीजी यांचे कौतुक केले.


लखपती दीदी, ड्रोन दीदी, उज्ज्वला योजना, जनधन योजना, बेटी बचाव बेटी पढाओ अशा योजना लागू करुन मोदीजींनी महिलांना आत्मनिर्भर करण्याबरोबरच त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्याचा निर्णय घेतला. महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू केले. शेतकरी सन्मान योजना, शिक्षण क्षेत्रात देखील अनेक मोठे निर्णय घेतले,असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. महाराष्ट्रात काम करणाऱ्याला लोक मतं देतात टीका करणाऱ्यांना नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना आपल्यावर दिवसरात्र टीका केली, मात्र त्यांना जनतेने घरी बसवले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. धारावीकरांना वर्षानुवर्ष गलिच्छ वस्तीत ठेवणारे मात्र अलिशान बंगल्यात राहिले. ज्यांनी मुंबई विकली आणि ज्यांच्यामुळे मुंबईकर मुंबईबाहेर फेकला गेला त्यांना आता धारावी पुनर्विकासाची पोटदुखी झाली. धारावी पुनर्विकासाचा मालक राज्य सरकार असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशी जळजळीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.



बडनेराचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश; अमरावतीत उबाठा गटाला खिंडार


अमरावती जिल्ह्यातील उबाठा पक्षाचे बडनेराचे माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत उबाठाचे उपमहानगरप्रमुख व नगरसेवक सुनील राऊत, उबाठा बडनेरा युवा सेना जिल्हाप्रमुख श्याम धाने पाटील, उपजिल्हाप्रमुख पवन दळवी, तालुका प्रमुख राहुल लांजेवर, निलेश तिवारी, संतोष मनोहर, निलेश पारवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मागील अडीच वर्षांत केलेल्या कामांमुळे जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Comments
Add Comment

तुम्हाला पाय घासत चालण्याची सवय आहे का? तर आजच बदला नाहीतर...

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये काही चांगल्या आणि काही वाईट सवयी असतात. चांगल्या सवयी

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

प्रवेशाचा मार्ग मोकळा पुढील सुनावणी १८ आणि १९ जुलैला मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू

Raj Thackeray Birthday: १४ जूनला शिवतीर्थावर येऊ नका; राज ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा १४ जून हा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे राज्यभरातून

हिना खाननंतर आता बॉलीवूड अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त; घेतला 'हा' निर्णय!

कर्करोगाशी झुंज देणारी अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीला आता चाहत्यांच्या प्रार्थनांचा आधार मुंबई : बॉलीवूड

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आता तिकीट आरक्षण यादी गाडी सुटण्याच्या २४ तास अगोदरच जाहीर होणार

मुंबई : मुंबईसह देशभरात रेल्वे अपघातांची संख्या वाढली आहे. यासह रेल्वे प्रशासनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे भारतीय

बाबा सिद्दीकीच्या हत्येमागील मास्टरमाइंडला कॅनडामध्ये अटक, कोण आहे झीशान अख्तर? जाणून घ्या

NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडातील (Baba Siddiqui murder Case) मास्टरमाइंड जीशान अख्तर ऊर्फ जस्सी पुरेवालला कॅनडाच्या सरे