पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरना विश्रांती कधी?

पाणी टंचाईला जबाबदार कोण; नागरिक संतप्त


मोखाडा : तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली पाणी टंचाईची समस्या जुन महिन्याचे दहा दिवस व्हायला आलेले आहेत तरी सुद्धा थांबलेली नाही.सद्यस्थितीत तालुक्यातील जवळपास ३७ गाव पाड्यांना १२ टँकरद्वारे पाणी पुरवीले जात आहे. त्यातभर की काय अजुनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झालेली नाही. यामुळे विहीरीनी तळ गाठलेला असून मागील वर्षी टँकर बंद व्हायला जुलै महिन्याची एक तारीख उजाडली होती यंदाही जुलै महिन्याचा पहीला आठवडा उजाडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वर्षानुवर्षे मोखाडाकरांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पाणीटंचाईला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.


अतिदुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत टँकर सुरू असतात. तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोहाडा अशी मोठ मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र कायम घशाला अशी परिस्थिती आहे. आजच्या घडीला तालुक्यातील ३७ गाव पाड्यात पाणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली असून १२ टँकरद्वारे टंचाईग्रस्त नागरिकांना पाणी पुरवले जात आहे. यामुळे प्रशासनाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पाणीटंचाईच्या मरणयातनेतून आदिवासी बांधवांची सुटका झालेली नाही. गावातील पाणी टंचाईची समस्या दूर व्हावी यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च करून तालुक्यात ५५ नळपाणी पुरवठा योजना मंजूर होऊन प्रगतीपथावर आहेत.


तर ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहीरी मधील गाळ काढणे, शेततळे, वन विभागाचे बंधारे, सिंचन विहीरी आदीसह सेवाभावी संस्थानी बांधलेल्या बंधारे या कामावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला मात्र याचा फायदा किती? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. दरवर्षीच पाणी टंचाई निर्मुलनासाठी होणारा करोडो रुपयांचा खर्च वाया जात असून जानेवारी महिन्यापासून सुरू होणारी पाणीटंचाई यंदाही जुन महिन्याचे दहा दिवस व्हायला आलेले असताना ही सुरूच आहे.

Comments
Add Comment

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या

अर्थसंकल्पातून पालघरसाठी विकासाची ‘महा-भेट’ : खासदार डॉ. सवरा

पालघर : केंद्रीय अर्थसंकल्पात पालघर जिल्ह्यासाठी विकासाचे नवीन दरवाजे उघडले आहेत. या बजेटमध्ये पालघरच्या

कोट्यवधींचा शिक्षण कर वसूल; शाळा हस्तांतरण मात्र रखडलेलेच

महापालिकेत शिक्षण समिती व सभापती नसण्याची परंपरा कायम राहणार गणेश पाटील विरार : महापालिकेची स्थापना होऊन १६

मुंबई-बडोदरा आणि भिवंडी-मनोर मार्गांचे काम युद्धपातळीवर

रस्त्यांच्या जाळ्यांमुळे विकासाची कोंडी फुटणार वसंत भोईर वाडा : गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेचा सामना

महापौरांना ७५ हजार रुपये वाहन प्रतिपूर्ती भत्ता

उपमहापौरांना ६५ हजार, तर विरोधी पक्षनेत्याला ५० हजार विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना

वसई-विरार महापालिकेत महापौर पदासाठी ७ अर्ज

उपमहापौर पदासाठी ५ अर्ज विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी शुक्रवारी अर्ज दाखल