पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरना विश्रांती कधी?

  75

पाणी टंचाईला जबाबदार कोण; नागरिक संतप्त


मोखाडा : तालुक्यातील गाव पाड्यांमध्ये जानेवारी महिन्यापासून सुरू झालेली पाणी टंचाईची समस्या जुन महिन्याचे दहा दिवस व्हायला आलेले आहेत तरी सुद्धा थांबलेली नाही.सद्यस्थितीत तालुक्यातील जवळपास ३७ गाव पाड्यांना १२ टँकरद्वारे पाणी पुरवीले जात आहे. त्यातभर की काय अजुनही पाहिजे तेवढ्या प्रमाणात पाऊस पडायला सुरुवात झालेली नाही. यामुळे विहीरीनी तळ गाठलेला असून मागील वर्षी टँकर बंद व्हायला जुलै महिन्याची एक तारीख उजाडली होती यंदाही जुलै महिन्याचा पहीला आठवडा उजाडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे वर्षानुवर्षे मोखाडाकरांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या पाणीटंचाईला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.


अतिदुर्गम डोंगराळ भागात असलेल्या मोखाडा तालुक्यातील आदिवासींना दरवर्षीच पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाणीटंचाईची समस्या तोंड वर काढत असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यत टँकर सुरू असतात. तालुक्यात खोच, पळसपाडा, मारुतीची वाडी, कारेगाव, मोहाडा अशी मोठ मोठी पाच धरणे उशाला असून कोरड मात्र कायम घशाला अशी परिस्थिती आहे. आजच्या घडीला तालुक्यातील ३७ गाव पाड्यात पाणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाली असून १२ टँकरद्वारे टंचाईग्रस्त नागरिकांना पाणी पुरवले जात आहे. यामुळे प्रशासनाला देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पाणीटंचाईच्या मरणयातनेतून आदिवासी बांधवांची सुटका झालेली नाही. गावातील पाणी टंचाईची समस्या दूर व्हावी यासाठी शासनाकडून लाखो रुपये खर्च करून तालुक्यात ५५ नळपाणी पुरवठा योजना मंजूर होऊन प्रगतीपथावर आहेत.


तर ठक्कर बाप्पा योजना, लघु पाटबंधारे, जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बंधारे, विहीरी मधील गाळ काढणे, शेततळे, वन विभागाचे बंधारे, सिंचन विहीरी आदीसह सेवाभावी संस्थानी बांधलेल्या बंधारे या कामावर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाला मात्र याचा फायदा किती? याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. दरवर्षीच पाणी टंचाई निर्मुलनासाठी होणारा करोडो रुपयांचा खर्च वाया जात असून जानेवारी महिन्यापासून सुरू होणारी पाणीटंचाई यंदाही जुन महिन्याचे दहा दिवस व्हायला आलेले असताना ही सुरूच आहे.

Comments
Add Comment

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,

लिपी आधी मरते, मग भाषा: दीपक पवार

वसई : "भाषा नंतर मरते, पण लिपी आधी मरते. तिच्या नियमित वापराची आणि संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. माणसं, झाडं

वसई-विरारची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या ५ मंडळ अध्यक्षांना पदोन्नती विरार : भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक जिल्हा असलेल्या वसई-विरारची जिल्हा