लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा चढता आलेख !

५ दिवसांत १ लाख ३१ हजार महिलांचा प्रवास


विरार : वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून मनपाच्या परिवहन सेवेत महिलांना प्रवासामध्ये दिलेल्या ५० टक्के तिकीट सवलतीला महिलांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी १८ हजार प्रवासी संख्या असलेल्या महिला प्रवाशांचा आकडा पाचव्या दिवशी ३० हजारावर गेला आहे.


महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ३७ मार्गांवर १५४ बसच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे. वसईच्या विद्यमान आमदार स्नेहा दुबे पंडित आणि माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या समर्थकांकडून या उपक्रमाच्या श्रेयासाठी करण्यात आलेल्या दाव्यावरून ही योजना सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चांगलीच गाजली. आता वसई-विरार महापालिकेच्या मोठ्या क्षेत्रांमध्ये या योजनेची खूप चर्चा आहे.



तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना एक जूनपासून प्रारंभ करण्यात आली. पहिल्या दिवशी १८ हजार ८५६ महिलांनी मनपाच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला. दुसऱ्या दिवशीपासून महिला प्रवाशांचा आकडा वाढत गेलेला आहे. २ जून रोजी २५ हजार ११२, ३ जून रोजी २८ हजार ०५०,४ जूनला २८ हजार ५७५ आणि ५ जून रोजी ३० हजार ३९२ अशा प्रकारे पाच दिवसांमध्ये एकूण १ लाख ३० हजार ९८५ महिला प्रवाशांनी सवलतीच्या तिकीट दराचा फायदा घेत महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळत असल्याबाबत महिलांमध्ये दिवसेंदिवस जनजागृती होत आहे.



वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन सेवेमध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, कर्करोग पीडित रुग्ण अशा काही प्रवाशांना मोफत प्रवासाची सोय करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात आल्याने महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- विश्वनाथ तळेकर, सहा.आयुक्त परिवहन सेवा, वसई विरार महानगरपालिका
Comments
Add Comment

Doctors Strike : डॉक्टरांचा राज्यव्यापी संप अखेर मागे! रुग्णांना मोठा दिलासा; मात्र ९ ऑगस्टपासून आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा

ठाणे : डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने पुकारलेला राज्यव्यापी संप

Ambernath News : अंबरनाथमध्ये होर्डिंग लावताना विजेचा धक्का; 24 वर्षीय कामगाराचा मृत्यू

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या हद्दीत होर्डिंग उभारण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात 24 वर्षीय कामगाराचा

Kalyan Crime : कल्याणमधील ‘पेंद्या भाई’ हत्येचा 36 तासांत उलगडा; तिघांना अटक, एक आरोपी फरार

कल्याण : कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरात झालेल्या अर्जुन काळपांडे उर्फ ‘पेंद्या भाई’ यांच्या हत्येचा कल्याण

Kalyan News : कल्याणच्या भटाळे तलावाच्या विकासासाठी विशेष निधीची मागणी; नरेंद्र पवारांनी दिले निवेदन

कल्याण : कल्याण शहराच्या (Kalyan) ऐतिहासिक वारशाचा (Heritage) महत्त्वाचा भाग असलेल्या भटाळे तलावाच्या (Bhatale Lake) पुनरुज्जीवन

Mira Road Accident : मिरा रोडमध्ये बांधकाम साईटवर मोठा अपघात; ११ व्या मजल्यावरून क्रेन थेट खाली, अपघातात एकाचा मृत्यू

मुंबई : मिरा रोड (Mira Road) येथील जेपी नॉर्थ (JP North) कॉम्प्लेक्स परिसरात शुक्रवारी सायंकाळी बांधकाम साईटवर (Construction Site) भीषण

Eknath Shinde : 'कच्छी समाजाशी नातं हे कुटुंबासारखंच'; ठाण्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : कच्छी अस्मिता मंचतर्फे आयोजित 'कच्छी पगडी कोणशिरे' या गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कच्छी