दंगल सुरू झाल्यामुळे मणिपूरच्या पाच जिल्ह्यांत पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

इंफाळ : राष्ट्रीय तपास संस्थेने अर्थात एनआयएने मैतेई ग्रुप आरंबाई टेंगोलच्या पाच जणांना अटक केली आहे. यातील एक स्थानिक स्वयंघोषीत कमांडर आहे. ही अटक होणार याचा अंदाज येताच मणिपूरच्या काही भागांमध्ये दंगल करायला सुरुवात झाली. पण सर्वत्र चोख बंदोबस्तामुळे आरोपींना पलायन करणे जमले नाही. अखेर रविवारी ८ जून २०२५ रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पाचही जणांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर दंगल आणखी भडकली. दंगलीची तीव्रता वाढू नये म्हणून इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थोबुल, बिशनपूर, काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले आहे.

रात्री भडकलेल्या दंगलीचे पडसाद आंतरराष्ट्रीय सीमेजवळच्या मोरेह पर्यंत दिसून आले. हिंसा आणखी पसरू नये म्हणून सर्वत्र दंगल प्रभावीत सर्व भागांमध्ये संचारबंदी अर्थात कर्फ्यू लागू करण्यात आली आहे. संपूर्ण बिष्णुपुर जिल्ह्यातही संचारबंदी आहे. दंगल करणाऱ्यांनी अटकेतील पाच जणांच्या सुटकेची मागणी करत क्वाकीथेल आणि उरीपोक येथे रस्त्यांवर टायर आणि जुने फर्निचर जाळले. जमाव मोठा असल्याचा आणि वाढत असल्याचा अंदाज येताच सुरक्षा पथकाने हवेत गोळीबार केला. गर्दी हटत नसल्याचे बघून दंगल आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट गोळ्यांचा वापर करण्याचा निर्णय झाला आणि जमावाच्या दिशेने गोळीबार करण्यात आला.

तेंगोपाल जिल्ह्यातील एका कुकी व्यक्तीच्या अटकेला विरोध करण्यासाठी स्थानिक मोरेहमध्ये रस्त्यांवर आले. पण सुरक्षा पथक घटनास्थळी तातडीने आल्यामुळे हिंसा टळली. आंदोलकांनी अटकेतील व्यक्तीच्या सुटकेची मागणी केली. यामुळे मोरेहमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. भाजपा खासदार लीशेंबा सनाजाओबा यांनी नागरिकांना शांत रहाण्याचे तसेच कायदा - सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

  1. मैतेईशी संबंधित पाच जणांना अट, अटकेचे कारण समजले नाही. अटकेवरुन हिंसाचार

  2. जमावाने केली हिंसा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड, अनेक ठिकाणी लुटालूट

  3. आंदोलकांनी राजधानीत विमानतळाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर आणि राजभवनाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर केला रास्तारोको.

  4. जमावावर लाठीमार, जमाव पांगवण्यासाठी सुरक्षा पथकांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

  5. बिष्णुपुर जिल्ह्यात संचारबंदी अर्थात कर्फ्यू. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, थौबल आणि काकचिंग व्हॅली जिल्ह्यांमध्ये संचारबंदी अर्थात कर्फ्यू.

  6. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थोबुल, बिशनपूर, काकचिंग या पाच जिल्ह्यांमध्ये पाच दिवस इंटरनेट आणि मोबाईल नेटवर्क बंद

  7. शांतता राखा आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करा; भाजपाच्या राज्यसभा खासदार लेशेम्बा सानाजाओबा यांचे आवाहन

  8. अटकेचा निषेध म्हणून देण्यात आली बंदची हाक

  9. बंदी घातलेल्या संघटनांशी संबंधित तीन दहशतवाद्यांना अटक, स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त

  10. पुढील निर्णयापर्यंत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटच सुरू राहणार. फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये कोणीही सरकार स्थापन केले नसल्यामुळे केंद्राने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.

Comments
Add Comment

बेंगळुरू विमानतळावर १.५७ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

बेंगळुरू : बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वर सीमाशुल्क विभागाने आंतरराष्ट्रीय

वेदना कठीण मग मृत्यूची काय भीती ....अखेर ३३ वर्षीय हरीशला अखेर सर्वोच न्यायालयाने दिली इच्छामरणाची परवानगी

नवी दिल्ली : मृत्यूचे भय हे बहुतेक लोकांना असत, पण जेव्हा असहाय्य वेदना असतील तिथे मृत्यूही क्षुल्लक जाणवतो. असाच

Gas Shortage: 'गॅस'टंचाईवर सरकारची पावलं काय?, जाणून घ्या कुठे कुठे गॅसची कपात?

नवी दिल्ली: अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा

Narendra Modi : पंतप्रधान मोदींचा केरळ - तामिळनाडू दौरा; हजारो कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या म्हणजेच बुधवार ११ मार्च २०२६ रोजी केरळ आणि तामिळनाडूचा दौरा करणार असून या

ESMA Act : इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'एस्मा' कायदा लागू

इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा आज (मंगळवार १० मार्च) अकरावा दिवस आहे. या युद्धामुळे जगातील इंधन टंचाईवर मोठा

गॅस पुरवठ्याबाबत केंद्राचा ऐतिहासिक निर्णय

नवी दिल्ली: पश्चिम आशियामध्ये इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणाव आता टोकाला पोहोचला असून, त्याचे पडसाद