समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल झाला. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्याने संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी, २४ तासांत या महामार्गावरून तब्बल ३८ हजार ९८७ वाहनांनी प्रवास केला. यापैकी ५ हजार वाहने नव्याने वाहतुकीसाठी खुल्या झालेल्या इगतपुरी – आमणे टप्प्यावरून धावली.


'महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील ६२५ किमी लांबीचा नागपूर – इगतपुरी टप्पा वाहतूक सेवेत होता.


इगतपुरी – आमणे हा ७६ किमी लांबीचा शेवटचा टप्पा गुरुवारपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल झाला असून नागपूर – आमणे, ठाणे प्रवास १६ तासांऐवजी ८ तासात करणे शक्य झाले आहे. एमएसआरडीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार नागपूर – इगतपुरीदरम्यान अडीच वर्षात (१ जून २०२५पर्यंत) दोन कोटी ११ लाख ३४ हजार ३२२ वाहनांनी प्रवास केला आहे. तर या वाहनांकडून पथकराच्या रुपाने एमएसआरडीसीला १५३० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.


समृद्धी महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आता नागपूरवरून थेट ठाणे, मुंबईला अतिजलद येणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता मुंबईच्या दिशेने येणाऱ्या आणि नागपुरला जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. पहिल्या दिवशी समृद्धी महामार्गावरील प्रवासी संख्येत चांगली वाढ झाल्याची माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी