नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश


पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य उत्पादने, पशू इत्यादीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान ग्रस्तासाठी निधीची आग्रही मागणी करून २ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे.


पालघर जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे एप्रिल आणि मे २०२५ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली. ४ ते ६ एप्रिल, ६ व ७ मे आणि २३ ते २५ मे २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात एकूण ३८ घरे पूर्णतः तर ३ हजार ८५२ घरे अंशतः बाधित झाली आहेत. याशिवाय १० झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या असून ६ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.


या आपत्तीग्रस्तांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाकडून २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात २ जून रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाची सविस्तर माहिती घेऊन पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडला. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग, यांचेमार्फत रु.२ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून तो संबंधित तहसिलदारांमार्फत बाधितांना वितरित करण्याचे काम सुरू आहे.



सर्वाधिक नुकसान घरांचे


जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सर्वात जास्त नुकसान घरांचे झाले आहे. एकूण ३८ घरे पूर्णत: नष्ट झाली असून ३ हजार ८५२ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. शासनाने २ कोटी ७० लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे.


वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या पुनर्वसनासाठी दिलासादायक ठरणार आहे. नुकसान झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या