नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

  18

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश


पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य उत्पादने, पशू इत्यादीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान ग्रस्तासाठी निधीची आग्रही मागणी करून २ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे.


पालघर जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे एप्रिल आणि मे २०२५ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली. ४ ते ६ एप्रिल, ६ व ७ मे आणि २३ ते २५ मे २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात एकूण ३८ घरे पूर्णतः तर ३ हजार ८५२ घरे अंशतः बाधित झाली आहेत. याशिवाय १० झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या असून ६ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.


या आपत्तीग्रस्तांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाकडून २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात २ जून रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाची सविस्तर माहिती घेऊन पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडला. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग, यांचेमार्फत रु.२ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून तो संबंधित तहसिलदारांमार्फत बाधितांना वितरित करण्याचे काम सुरू आहे.



सर्वाधिक नुकसान घरांचे


जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सर्वात जास्त नुकसान घरांचे झाले आहे. एकूण ३८ घरे पूर्णत: नष्ट झाली असून ३ हजार ८५२ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. शासनाने २ कोटी ७० लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे.


वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या पुनर्वसनासाठी दिलासादायक ठरणार आहे. नुकसान झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर.

Comments
Add Comment

युवक ठरला नियोजनशून्य व्यवस्थेचा बळी!

दुसऱ्याची चूक जयेशच्या जीवावर बेतली विरार: विजेच्या धक्क्याने अर्नाळा येथे मृत्यू झालेल्या जयेश घरत हा केवळ

५० लाख बांबू वृक्ष लागवडीचा शुभारंभ

भातशेतीपेक्षा बांबूशेती करण्याचे आवाहन पालघर : संपूर्ण विश्वभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा होत असताना दुर्गम

घरकुलासाठी ९१,९९१ कुटुंबाचे सर्वेक्षण !

१८ जूनपर्यंत आणखी मुदतवाढ; नागरिकांना मिळणार हक्काचे घर पालघर : "सर्वांसाठी घरे" शासनाच्या या धोरणाची यशस्वी

वसईतील पारंपरिक व्यवसाय संकटात!

वसई : वसईचा परिसर हा पारंपरिक व्यवसायात अग्रेसर असा परिसर म्हणून ओळखला जातो. या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी

'शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये'

पालघर :भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेल्या विस्तारित श्रेणी हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात पुढील एक

आपत्तीचा सामना करण्यासाठी सज्ज राहावे

पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश पालघर :राज्यामध्ये कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असून पालघर जिल्ह्यामध्ये