नुकसानग्रस्तांसाठी मिळाला पाऊणे दोन कोंटीचा निधी

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश


पालघर : अवकाळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील घरे, शेती, फळशेती, मत्स्य उत्पादने, पशू इत्यादीचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नुकसान ग्रस्तासाठी निधीची आग्रही मागणी करून २ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे.


पालघर जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यांमुळे एप्रिल आणि मे २०२५ महिन्यांत मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली. ४ ते ६ एप्रिल, ६ व ७ मे आणि २३ ते २५ मे २०२५ या कालावधीमध्ये जिल्ह्यात एकूण ३८ घरे पूर्णतः तर ३ हजार ८५२ घरे अंशतः बाधित झाली आहेत. याशिवाय १० झोपड्या पूर्णतः नष्ट झाल्या असून ६ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे.


या आपत्तीग्रस्तांसाठी शासनाच्या महसूल व वन विभागाकडून २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ इतक्या निधीची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात २ जून रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रस्तावाची सविस्तर माहिती घेऊन पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा मांडला. मुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार विभागीय आयुक्त, कोकण विभाग, यांचेमार्फत रु.२ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून तो संबंधित तहसिलदारांमार्फत बाधितांना वितरित करण्याचे काम सुरू आहे.



सर्वाधिक नुकसान घरांचे


जिल्ह्यात झालेल्या वादळी वारा व पावसामुळे सर्वात जास्त नुकसान घरांचे झाले आहे. एकूण ३८ घरे पूर्णत: नष्ट झाली असून ३ हजार ८५२ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी २ कोटी ५० लाख ६३ हजार ९२५ रुपये निधीची मागणी करण्यात आली होती. शासनाने २ कोटी ७० लाख रुपयाचा निधी मंजूर केला आहे.


वादळी वारा व पावसामुळे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर आली असून, शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत त्यांच्या पुनर्वसनासाठी दिलासादायक ठरणार आहे. नुकसान झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.
- डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हाधिकारी, पालघर.

Comments
Add Comment

महादेवाच्या पिंडीवर अवतरली नागदेवता! बघ्यांची उसळली गर्दी

वाडा: तालुक्यातील दुपारेपाडा या गावातील श्री गणेश मंदिरात बुधवारी सायंकाळच्या सुमारास या मंदिरातील श्री

Vasai Fort : 'मला मराठी येत नाही!' म्हणत वसई किल्ल्यावर सुरक्षा रक्षकाचा माज; शिवरायांच्या वेशातील युवकाला फोटो काढण्यास मज्जाव!

पालघर : वसईच्या ऐतिहासिक जंजिरे वसई किल्ल्यावर (Vasai Fort) दीपोत्सवाच्या (Deepotsav) शुभदिनी एक अनपेक्षित आणि वादग्रस्त घटना

विरारमधील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग; मोठे आर्थिक नुकसान

विरार: विरार पूर्वेकडील आरजे सिग्नलजवळ असलेल्या एका फर्निचरच्या मोठ्या दुकानाला २१ ऑक्टोबरच्या दुपारी भीषण आग

रिचा पाटीलच्या आत्महत्येची सखोल चौकशी करा

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट विरार : विरार पश्चिम येथील विवा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या १९

ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याचे भाव घसरले, कांदा उत्पादक हवालदिल

लासलगाव : ऐन सणासुदीच्या तोंडावर कांद्याच्या बाजार भावात घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले

वाढवण बंदराविरोधातील स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

 वाढवण बंदराच्या नियोजित विकासाला स्थगिती देण्याची स्थानिक संघटनांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने