विद्यापीठांच्या निधी प्रस्तावांना मंजुरी नाही : कृषिमंत्र्यांची तंबी

राहुरी : राज्यातील कृषी विद्यापीठांनी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करताना आधी गरज स्पष्ट करावी. बांधकाम किंवा निधीसंबंधी कोणत्याही प्रस्तावांना सरसकट मान्यता दिली जाणार नाही,अशी तंबी कृषिमंत्र अँड माणिकराव कोकाटे यांनी दिली.


महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११९ वी बैठक सोमवारी (ता.२) पुण्यात झाली.या वेळी अध्यक्षस्थानावरून कृषिमंत्र्यांनी विद्यापीठांना खडेबोल सुनावले. सूरज मांढरे, प्रतिभा पाटील, तुषार पवार, रावसाहेब भागडे, डॉ.यशवंत साळे, डॉ.धीरजकुमार कदम, डॉ.किशोर शिंदे, डॉ.वैभव शिंदे, अंकुश नलावडे, जनार्दन कातकडे, वसंतराव नाईक, कुलगुरू डॉ.इंद्र मणी, गणेश शिंदे, विनायक काशीद, प्रवीण देशमुख, मोरेश्वर वानखेडे उपस्थित होते. कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ.देशमुख, कुलगुरू डॉ.शरद गडाख, डॉ.बाळासाहेब सावंत, डॉ.संजय भावे, डॉ.विवेक दामले दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. कृषी परिषदेच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांच्या कामांसाठी निधी मंजुरीचे प्रस्ताव मांडले गेले आहेत.महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वसतिगृहांच्या बांधकामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मागितला.पुणे कृषी महाविद्यालयात वसतिगृहासाठी १२ कोटी रुपये मागण्यात आले.धुळ्यात पावणेसहा कोटी,हाळगाव कृषी महाविद्यालयात बांधकामासाठी साडेचार कोटी रुपये,नंदुरबार कृषी महाविद्यालयात बांधकामासाठी १३ कोटी रुपये मागितले आहेत.


डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पनवेलमध्ये बांधकामासाठी ४४ लाख रुपये,तर याच विद्यापीठाने जागा विकास व विहीर दुरुस्तीसाठी ३० लाख रुपये मागितले. याशिवाय महाविद्यालयांमधील बांधकामाकरिता आम्हाला ७० कोटींचा निधी द्या,असेही दापोलीच्या विद्यापीठाने प्रस्तावांमध्ये म्हटले आहे.सूत्रसंचालन म्हणण्यानुसार,कृषिमंत्र्यांनी या प्रस्तावांची निकड स्पष्ट करण्यास सांगितले.कृषी शिक्षण व संशोधनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्य प्रस्तावांना मंजुरी देण्याची तयारी शासनाची आहे.तथापि, निधी खर्चाची आवश्यकता का वाटते या बाबत सादरीकरण केले जावे, असा आग्रह कृषिमंत्र्यांनी धरला.कृषी परिषदेच्या एका सदस्याने सांगितले की, कृषिमंत्र्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.बैठकीत नेमके कोणते प्रस्ताव मंजूर केले गेले, कोणते नामंजूर किंवा स्थगित केले गेले याविषयी माहिती मिळू शकली नाही. कृषी परिषदेच्या बैठकीनंतर कृषिमंत्र्यांनी लगेचच विद्यापीठांच्या संशोधन व शिक्षणविषयक उपक्रमांचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री

Pune News : थेट जमिनीवर आपटल्या अन्...; वॉटरपार्कमधील कमी पाणी महिलेच्या जीवावर बेतले, आयुष्यभराचे अपंगत्व

पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर