विद्यापीठांच्या निधी प्रस्तावांना मंजुरी नाही : कृषिमंत्र्यांची तंबी

राहुरी : राज्यातील कृषी विद्यापीठांनी निधी मागणीचे प्रस्ताव सादर करताना आधी गरज स्पष्ट करावी. बांधकाम किंवा निधीसंबंधी कोणत्याही प्रस्तावांना सरसकट मान्यता दिली जाणार नाही,अशी तंबी कृषिमंत्र अँड माणिकराव कोकाटे यांनी दिली.


महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेची ११९ वी बैठक सोमवारी (ता.२) पुण्यात झाली.या वेळी अध्यक्षस्थानावरून कृषिमंत्र्यांनी विद्यापीठांना खडेबोल सुनावले. सूरज मांढरे, प्रतिभा पाटील, तुषार पवार, रावसाहेब भागडे, डॉ.यशवंत साळे, डॉ.धीरजकुमार कदम, डॉ.किशोर शिंदे, डॉ.वैभव शिंदे, अंकुश नलावडे, जनार्दन कातकडे, वसंतराव नाईक, कुलगुरू डॉ.इंद्र मणी, गणेश शिंदे, विनायक काशीद, प्रवीण देशमुख, मोरेश्वर वानखेडे उपस्थित होते. कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, डॉ.देशमुख, कुलगुरू डॉ.शरद गडाख, डॉ.बाळासाहेब सावंत, डॉ.संजय भावे, डॉ.विवेक दामले दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. कृषी परिषदेच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांच्या कामांसाठी निधी मंजुरीचे प्रस्ताव मांडले गेले आहेत.महात्मा फुले कृषी विद्यापीठाने वसतिगृहांच्या बांधकामासाठी १७ कोटी रुपयांचा निधी मागितला.पुणे कृषी महाविद्यालयात वसतिगृहासाठी १२ कोटी रुपये मागण्यात आले.धुळ्यात पावणेसहा कोटी,हाळगाव कृषी महाविद्यालयात बांधकामासाठी साडेचार कोटी रुपये,नंदुरबार कृषी महाविद्यालयात बांधकामासाठी १३ कोटी रुपये मागितले आहेत.


डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने पनवेलमध्ये बांधकामासाठी ४४ लाख रुपये,तर याच विद्यापीठाने जागा विकास व विहीर दुरुस्तीसाठी ३० लाख रुपये मागितले. याशिवाय महाविद्यालयांमधील बांधकामाकरिता आम्हाला ७० कोटींचा निधी द्या,असेही दापोलीच्या विद्यापीठाने प्रस्तावांमध्ये म्हटले आहे.सूत्रसंचालन म्हणण्यानुसार,कृषिमंत्र्यांनी या प्रस्तावांची निकड स्पष्ट करण्यास सांगितले.कृषी शिक्षण व संशोधनासाठी अत्यंत आवश्यक असलेल्य प्रस्तावांना मंजुरी देण्याची तयारी शासनाची आहे.तथापि, निधी खर्चाची आवश्यकता का वाटते या बाबत सादरीकरण केले जावे, असा आग्रह कृषिमंत्र्यांनी धरला.कृषी परिषदेच्या एका सदस्याने सांगितले की, कृषिमंत्र्यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे.बैठकीत नेमके कोणते प्रस्ताव मंजूर केले गेले, कोणते नामंजूर किंवा स्थगित केले गेले याविषयी माहिती मिळू शकली नाही. कृषी परिषदेच्या बैठकीनंतर कृषिमंत्र्यांनी लगेचच विद्यापीठांच्या संशोधन व शिक्षणविषयक उपक्रमांचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद