चकमकीत नक्षली नेता सिंहाचलमचा मृत्यू

  55

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशात गंभीर गुन्हे


गडचिरोली : छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत नक्षल चळवळीतील अत्यंत मोठा नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य सिंहाचलम याला चकमकीत ठार केले. या नक्षलवाद्याच्या मुसक्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर गडचिरोली सीमेपासून जवळच असलेल्या भागात ही मोठी कारवाई घडली. वरिष्ठ माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी मोहीम सुरू केली, तेव्हा इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलात गोळीबार सुरू झाला होता.


सिंहाचलम हा गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रीय होता. तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. विशेषतः नक्षल प्रचार आणि शिक्षण विभागाची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्रप्रदेश अशा ५ राज्यांत गंभीर गुन्हे दाखल होते. या राज्यांनी त्याच्यावर मिळून तब्बल ३ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. या नक्षलवाद्याच्या मुसक्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते.


इंद्रावती नॅशनल पार्कच्या घनदाट जंगलात नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली असता दोन्ही गटांमध्ये जोरदार चकमक उडाली. यामध्ये सिंहाचलम ठार झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चकमकीनंतर गडचिरोली, सिरोंचा आणि अहेरी भागात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. सिंहाचलमसारखा मोठा नक्षल नेता ठार झाल्याने संघटनेला मोठा धक्का बसला असून संभाव्य सूड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत