चकमकीत नक्षली नेता सिंहाचलमचा मृत्यू

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशात गंभीर गुन्हे


गडचिरोली : छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत नक्षल चळवळीतील अत्यंत मोठा नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य सिंहाचलम याला चकमकीत ठार केले. या नक्षलवाद्याच्या मुसक्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर गडचिरोली सीमेपासून जवळच असलेल्या भागात ही मोठी कारवाई घडली. वरिष्ठ माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी मोहीम सुरू केली, तेव्हा इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलात गोळीबार सुरू झाला होता.


सिंहाचलम हा गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रीय होता. तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. विशेषतः नक्षल प्रचार आणि शिक्षण विभागाची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्रप्रदेश अशा ५ राज्यांत गंभीर गुन्हे दाखल होते. या राज्यांनी त्याच्यावर मिळून तब्बल ३ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. या नक्षलवाद्याच्या मुसक्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते.


इंद्रावती नॅशनल पार्कच्या घनदाट जंगलात नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली असता दोन्ही गटांमध्ये जोरदार चकमक उडाली. यामध्ये सिंहाचलम ठार झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चकमकीनंतर गडचिरोली, सिरोंचा आणि अहेरी भागात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. सिंहाचलमसारखा मोठा नक्षल नेता ठार झाल्याने संघटनेला मोठा धक्का बसला असून संभाव्य सूड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार