चकमकीत नक्षली नेता सिंहाचलमचा मृत्यू

महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, आंध्र प्रदेशात गंभीर गुन्हे


गडचिरोली : छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कच्या जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत नक्षल चळवळीतील अत्यंत मोठा नेता आणि केंद्रीय समितीचा सदस्य सिंहाचलम याला चकमकीत ठार केले. या नक्षलवाद्याच्या मुसक्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते. अखेर गडचिरोली सीमेपासून जवळच असलेल्या भागात ही मोठी कारवाई घडली. वरिष्ठ माओवादी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संयुक्त पथकाने नक्षलविरोधी मोहीम सुरू केली, तेव्हा इंद्रावती राष्ट्रीय उद्यानातील जंगलात गोळीबार सुरू झाला होता.


सिंहाचलम हा गेल्या ४० वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रीय होता. तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत होता. विशेषतः नक्षल प्रचार आणि शिक्षण विभागाची जबाबदारी त्याच्याकडे होती. त्याच्यावर महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा आणि आंध्रप्रदेश अशा ५ राज्यांत गंभीर गुन्हे दाखल होते. या राज्यांनी त्याच्यावर मिळून तब्बल ३ कोटींचे बक्षीस जाहीर केले होते. या नक्षलवाद्याच्या मुसक्याचे राज्यभरात सातत्याने प्रयत्न सुरू होते.


इंद्रावती नॅशनल पार्कच्या घनदाट जंगलात नक्षलविरोधी मोहिमेअंतर्गत सीआरपीएफ व स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली असता दोन्ही गटांमध्ये जोरदार चकमक उडाली. यामध्ये सिंहाचलम ठार झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व नक्षल साहित्य जप्त करण्यात आले आहे. या चकमकीनंतर गडचिरोली, सिरोंचा आणि अहेरी भागात सुरक्षा यंत्रणांनी हाय अलर्ट जाहीर केला आहे. सिंहाचलमसारखा मोठा नक्षल नेता ठार झाल्याने संघटनेला मोठा धक्का बसला असून संभाव्य सूड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये