शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य करण्याची अट घालून शर्मिष्ठाला उच्च न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. शर्मिष्ठाला विना परवानगी देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. नव्याने ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज नाही, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. यानंतर शर्मिष्ठाला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर गुरुग्राम येथून तिला अटक केली होती. आक्षेपार्ह भाषेचा वापर करत कायदा सुव्यवस्थला बाधा आणणारे भाष्य केल्याचा आरोप शर्मिष्ठावर करण्यात आला होता. एरवी अनेक विषयांवर मतप्रदर्शन करणारे ऑपरेशन सिंदूर सुरू होताच मौनात गेल्याचे वक्तव्य शर्मिष्ठाने केले होते. सेलिब्रेटींवर शर्मिष्ठाने टीका केली होती. हा व्हिडीओ केल्यानंतर काही तासांनी शर्मिष्ठाने भावनेच्या भरात चुकीचे बोलल्याचे कबुल केले आणि व्हिडीओ डीलीट केला. पण या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाविरोधात गुन्हा नोंदवला आणि तिला अटक केली होती.

शर्मिष्ठाने व्हिडीओ डीलीट केला आणि माफी मागितली त्यामुळे तिला अटक करण्याची आवश्यकताच नव्हती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यानंतर शर्मिष्ठाची सुटका करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारवर दबाव वाढला. अखेर कोलकाता उच्च न्यायालयाने सगळ्या बाजू तपासून शर्मिष्ठाला जामीन मंजूर केला.
Comments
Add Comment

केरळच्या सुप्रसिद्ध मंदिरात सोन्याची चोरी, SIT चौकशीचा न्यायालयाचा आदेश

तिरुवनंतपुरम : सबरीमाला मंदिर पर्यटनाच्या दृष्टीने केरळसाठी फार महत्त्वाचे आहे. सोन्याचा गाभारा आणि इतर

ट्रॅफिक का थांबले? पहा आणि कमेंट करुन सांगा... ब्रिजवरून ट्रेन गेली, आणि खालील रस्त्यावरचा 'तो' क्षण; व्हिडिओ व्हायरल

मुंबई: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे कधी आश्चर्यचकित करतात, तर कधी हसून पोट दुखवतात. असाच

बिहारमध्ये निवडणुकीचे बिगूल वाजले; मतदानाच्या तारखा जाहीर, कधी लागणार निकाल?

बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान, तर १४ नोव्हेंबर रोजी निकाल ७.४२ कोटी मतदार करणार

सर्वोच्च न्यायालयात घडली धक्कादायक घटना, वकिलाने केला सरन्यायाधीशांवर हल्ला

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात धक्कादायक घटना घडली. एका वकिलाने सरन्यायाधीशांवर वस्तू फेकून हल्ला केला. या

बिहार विधानसभा निवडणुकील बिगुल आज वाजणार ?

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाची आज (सोमवार ६ ऑक्टोबर २०२५) संध्याकाळी चार वाजता दिल्लीत विज्ञान भवन येथे पत्रकार

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ