शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य करण्याची अट घालून शर्मिष्ठाला उच्च न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. शर्मिष्ठाला विना परवानगी देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. नव्याने ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज नाही, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. यानंतर शर्मिष्ठाला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर गुरुग्राम येथून तिला अटक केली होती. आक्षेपार्ह भाषेचा वापर करत कायदा सुव्यवस्थला बाधा आणणारे भाष्य केल्याचा आरोप शर्मिष्ठावर करण्यात आला होता. एरवी अनेक विषयांवर मतप्रदर्शन करणारे ऑपरेशन सिंदूर सुरू होताच मौनात गेल्याचे वक्तव्य शर्मिष्ठाने केले होते. सेलिब्रेटींवर शर्मिष्ठाने टीका केली होती. हा व्हिडीओ केल्यानंतर काही तासांनी शर्मिष्ठाने भावनेच्या भरात चुकीचे बोलल्याचे कबुल केले आणि व्हिडीओ डीलीट केला. पण या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाविरोधात गुन्हा नोंदवला आणि तिला अटक केली होती.

शर्मिष्ठाने व्हिडीओ डीलीट केला आणि माफी मागितली त्यामुळे तिला अटक करण्याची आवश्यकताच नव्हती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यानंतर शर्मिष्ठाची सुटका करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारवर दबाव वाढला. अखेर कोलकाता उच्च न्यायालयाने सगळ्या बाजू तपासून शर्मिष्ठाला जामीन मंजूर केला.
Comments
Add Comment

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने