शर्मिष्ठा पनोलीला उच्च न्यायालयाने दिला जामीन

  77

कोलकाता : सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर शर्मिष्ठा पनोलीला कोलकाता उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. तपासात सहकार्य करण्याची अट घालून शर्मिष्ठाला उच्च न्यायालयाने दहा हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. शर्मिष्ठाला विना परवानगी देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. नव्याने ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज नाही, असे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले. यानंतर शर्मिष्ठाला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठा विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर गुरुग्राम येथून तिला अटक केली होती. आक्षेपार्ह भाषेचा वापर करत कायदा सुव्यवस्थला बाधा आणणारे भाष्य केल्याचा आरोप शर्मिष्ठावर करण्यात आला होता. एरवी अनेक विषयांवर मतप्रदर्शन करणारे ऑपरेशन सिंदूर सुरू होताच मौनात गेल्याचे वक्तव्य शर्मिष्ठाने केले होते. सेलिब्रेटींवर शर्मिष्ठाने टीका केली होती. हा व्हिडीओ केल्यानंतर काही तासांनी शर्मिष्ठाने भावनेच्या भरात चुकीचे बोलल्याचे कबुल केले आणि व्हिडीओ डीलीट केला. पण या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी शर्मिष्ठाविरोधात गुन्हा नोंदवला आणि तिला अटक केली होती.

शर्मिष्ठाने व्हिडीओ डीलीट केला आणि माफी मागितली त्यामुळे तिला अटक करण्याची आवश्यकताच नव्हती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. यानंतर शर्मिष्ठाची सुटका करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारवर दबाव वाढला. अखेर कोलकाता उच्च न्यायालयाने सगळ्या बाजू तपासून शर्मिष्ठाला जामीन मंजूर केला.
Comments
Add Comment

श्री दत्तात्रेयाच्या गिरनार पर्वतावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

येत्या २ जुलै रोजी स्थानिक प्रशासन घेणार योग्य खबरदारी जुनागढ : गुजरातमधील जुनागड येथे असलेल्या गिरनार

"अंतराळातून भारत खूप भव्य दिसतो" अंतराळवीर शुभांशू शुक्लाने मारल्या पंतप्रधान मोदींशी गप्पा

अंतराळातील सर्वात मोठे आव्हान काय आहे? पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लासोबत संवाद नवी

मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW)

Local Train Derails: तामिळनाडू पॅसेंजर ट्रेन रुळाहून घसरली, प्रवाशांमध्ये गोंधळ

चित्तेरी स्थानकावरून ट्रेन सुटल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज ऐकू आला चेन्नई: तामिळनाडूच्या रानीपेट जिल्ह्यात

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.