ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयार आहे. काही खेळाडू आधीच इंग्लंडमध्ये पोहोचलेत. तर काही खेळाडू लवकरच पोहोचतील. या दौऱ्याची संपूर्ण माहिती देण्यासाठी टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलने गुरूवारी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीरने बंगळुरूमध्ये बुधवारी झालेल्या बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.



बंगळुरू प्रकरणावर काय म्हणाले कोच


बंगळुरू प्रकरणावर जेव्हा कोच गंभीरला विचारले की तुम्ही या दुर्घटनेला कोणाला जबाबदार मानता, यावर गंभीर म्हणाला, कोण जबाबदार आहे हे ठरवणारा मी कोणी नाही. मात्र जेव्हा मी खेळाडू होतो तेव्हा अशा प्रकारच्या रोड शोवर विश्वास ठेवत नव्हतो. आता कोच म्हणूनही माझा याला पाठिंबा नाही. लोकांचे जीवन सगळ्यात महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला गर्दी नियंत्रणात ठेवता येत नसेल तर अशा रोड शोची कोणतीही गरज नाही.


गौतम गंभीर पुढे म्हणाले, मी नेहमीच मानतो की रोड शो नसले पाहिजे. ज्यांनी आपल्या प्रिय व्यक्तीला गमावले त्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. २००७मध्येही जेव्हा आम्ही जिंकलो होतो तेव्हाही माझे म्हणणे हेच होते. अशा प्रकारचे आयोजन बंद दरवाजाच्या आत असले पाहिजे. तेथे जे काही घडले ते अतिशय दु:खद होते. आम्ही एक खेळाडू, फ्रेंचायझी आणि चाहते म्हणून अधिक जबाबदार असले पाहिजे.


Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.