आयआरसीटीसीच्या सहलीसाठी ५ टक्के सवलत

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीला ९ जून २०२५ रोजी सुरुवात होणार असून ही सहल ५ रात्री आणि ६ दिवसांची आहे. या सहलीचे आरक्षण करण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असून पर्यटकांना पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे.


‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर ही सवलत देण्यात येणार आहे. या सहलीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरुवात होणार असून पर्यटकांना दादर, ठाणे स्थानकावरूनही सहलीत सहभागी होता येणार आहे. सहलीत सहभागी पर्यटकांना किल्ले रायगड, लाल महाल आणि कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा आदी किल्ले, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर या ठिकाणांना भेट देता येणार आहे.


हा सर्व प्रवास अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. या रेल्वेगाडीला शयनयान, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे जोडण्यात आले असून या गाडीची क्षमता ७४८ पर्यटकांना सामावून घेण्याइतकी आहे.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण