आयआरसीटीसीच्या सहलीसाठी ५ टक्के सवलत

मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी सहलीचे आयोजन केले आहे. या सहलीला ९ जून २०२५ रोजी सुरुवात होणार असून ही सहल ५ रात्री आणि ६ दिवसांची आहे. या सहलीचे आरक्षण करण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले असून पर्यटकांना पाच टक्के सवलत देण्यात येणार आहे.


‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्वावर ही सवलत देण्यात येणार आहे. या सहलीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुरुवात होणार असून पर्यटकांना दादर, ठाणे स्थानकावरूनही सहलीत सहभागी होता येणार आहे. सहलीत सहभागी पर्यटकांना किल्ले रायगड, लाल महाल आणि कसबा गणपती, शिवसृष्टी, शिवनेरी, प्रतापगड, पन्हाळा आदी किल्ले, भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर या ठिकाणांना भेट देता येणार आहे.


हा सर्व प्रवास अत्याधुनिक भारत गौरव एसी टुरिस्ट ट्रेनमधून होणार आहे. या रेल्वेगाडीला शयनयान, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे जोडण्यात आले असून या गाडीची क्षमता ७४८ पर्यटकांना सामावून घेण्याइतकी आहे.

Comments
Add Comment

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

Mumbai Megablock : मेगा 'ब्लॉक डे' मुंबईकरांना सतावणार! 'लाईफलाईन' लोकलची दुरुस्ती; कोणत्या मार्गांवर सेवा पूर्णपणे बंद राहणार?

मुंबई : मुंबईची लाईफलाइन (Mumbai Lifeline) असलेली उपनगरीय रेल्वे (Suburban Railway) लाखो प्रवाशांना घेऊन अविरत धावत असते. या लोकलच्या

यंदाच्या छठ पूजेत विरोधही होणार मवाळ, काय आहे कारण...

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी यंदा छठ पुजेच्या निमित्ताने

महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी १९,३१७ नवीन टॅबची खरेदी

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले टॅब आता जुने झाल्याने नव्याने

पाऊस पडल्यामुळे मुंबईची हवा झाली एकदम 'स्वच्छ'!

मुंबई : मुंबईत रात्री झालेल्या पावसामुळे मुंबईकरांना काही दिवसांपासूनच्या उष्णतेपासून आणि प्रदूषणापासून थोडा