मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जूनला समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचे लोकार्पण

  48

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा ठाणे जिल्ह्यातील आमणे ते नाशिकमधील इगतपुरी दरम्यानचा ७६ किमीचा अखेरचा टप्याचे लोकार्पण येत्या गुरुवारी, ५ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इगतपुरी येथे एका विशेष सोहळ्यात या टप्प्याचे लोकार्पण करण्यात येईल. लोकार्पणानंतर लगेचच हा मार्ग सामान्य वाहतुकीसाठी सुरू होईल.


समृद्धी महामार्गामुळे मुंबईहून जातांना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे प्रवसातील अंतर कमी आणि वेगवान झाले आहे. याआधी मुंबईहून नाशिकला जातांना ३ तास ४५ मिनिटांहून अधिक वेळ लागत होता. तो समृद्धी महामार्गामुळे २ तास ३० मिनिटे इतका कमी झाला आहे. म्हणजेच १ तास २० मिनिटे वाचून सूमारे ४० किमी. अंतर कमी झाले आहे.


७.७४ किमीच्या शहापूर तालुक्यातील सर्वात मोठ्या वाशाळा येथील बोगद्यामुळे कसारा घाट ओलांडणे अतिशय सोपे झाले आहे. ३६ मीटरची रुंदी आणि ६ पदरी महामार्गामुळे प्रवास जलद होणार आहे.


एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले की, इगतपुरी-आमणे या उर्वरित टप्प्याचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते. आता हा मार्ग सुरू झाल्यानंतर राज्याच्या विविध भागांशी असलेली मुंबईची जोड अधिक जलद, सुरक्षित आणि सुगम होणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला