अन्नसुरक्षेचे उल्लंघन झाल्याप्रकरणी धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची मोठी कारवाई

मुंबई: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी झेप्टो (Zepto) ची मूळ कंपनी किराणाकार्ट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडचा मुंबई, धारावीतील परवाना निलंबित केला आहे. महाराष्ट्र एफडीएने धारावी येथील झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकला, यादरम्यान सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, आणि अन्नपदार्थ साठवणुकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले, त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.

 धारावीच्या सुविधेत गंभीर अन्नसुरक्षेचे उल्लंघन झाल्याप्रकरणी एफडीएद्वारे हे निलंबन जारी करण्यात आले आहे. निरीक्षकांना अन्नपदार्थांवर बुरशीची वाढ, साचलेल्या पाण्याजवळ अन्न साठवणे आणि कालबाह्य झालेले उत्पादने आढळून आली. काही अन्नपदार्थ थेट ओल्या आणि अस्वच्छ जमिनीवर साठवले जात होते आणि शीतगृह युनिट्स निर्धारित सुरक्षा नियमांचे पालन करत नसल्याचे देखील आढळून आले.  

अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम आणि सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी ही कारवाई केली आहे. तपासणीनंतर, सहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा पाटील यांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) आणि अन्न सुरक्षा आणि मानके (अन्न व्यवसायांचे परवाना आणि नोंदणी) नियम, २०११ च्या नियमन २.१.८(४) अंतर्गत निलंबन आदेश जारी केले.

मीडियाला दिलेल्या माहितीत एफडीएने म्हटले की, आम्ही काही काळापासून या गोदामांची तपासणी करण्याची योजना आखत होतो. यादरम्यान आम्हाला अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या कार्यालयाद्वारे काही सूचना प्राप्त झाल्या. या सूचनांच्या आधारावर आम्ही तपासणी केली असता अतिशय वाईट परिस्थिती आढळली. त्यामुळेच आम्ही तात्काळ परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. अन्न सुरक्षा नियमांचे पूर्णपणे पालन होईपर्यंत आणि परवाना प्राधिकरणाकडून मंजुरी मिळेपर्यंत परवाना निलंबित राहील. या कारवाईवर कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. परंतु अशा कारवाईमुळे कंपनीच्या ब्रँड प्रतिमेवर आणि ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम होऊ शकतो.

Zepto ची प्रतिक्रिया?


या कारवाईवर Zepto कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या घटनेमुळे त्यांच्या ब्रँडवर आणि ग्राहकांच्या विश्वासावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा