टायर रिसायकलिंग फॅक्टरी दिवसा बंद, रात्री सुरू

  47

वाडा  : टायर रिसायकलिंग करणाऱ्या कंपन्यांमुळे वाडा तालुक्यातील हवा दूषित झाली होती. त्यामुळे वडवली गावाच्या हद्दीत असलेल्या दहा प्रदूषणकारी कारखाने पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद केले होते. बंद केलेले हे कारखाने शासनाचे आदेश धाब्यावर बसवून रात्री खुलेआम चालू असल्याचे येथील स्थानिक ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे.



तालुक्यातील वडवली या ग्रामपंचायतीच्या हद्दीत जुने टायर जाळून त्यापासून ऑइल तारा काढून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. प्रदूषित रासायनिक सांडपाणी हे येथील नैसर्गिक नाल्यात टाकत असल्याने नाल्यातील मासे अनेकवेळा मृत पावले आहेत. या प्रदूषणाबाबत अनेकदा पत्र व्यवहार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळ डोळे झाक करत आहे. त्यामुळे त्याचा त्रास येथील सहन करावा लागत आहे.

येथील एम. डी. पायरोलिसेस या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला आणि या स्फोटात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. प्रशासनाने कारखाने बंद केले. तरीदेखील आदेशाची पायमल्ली करत प्रदूषणकारी हे सर्व कारखाने रात्री सुरू असल्याचे उघडकीस आणले आहे. मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Comments
Add Comment

बेरोजगार उमेदवारांसाठी इस्राायल येथे रोजगाराची संधी

युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन पालघर : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना

आठ पंचायत समित्यांचीही अधिसूचना प्रसिद्ध पालघर : पालघर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

माजी आयुक्तांसह चौघांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रातील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणात ६ दिवसाच्या 'ईडी' कोठडीत असलेले पालिकेचे

विरार, वसई, नालासोपारामधील अनेक भाग पाण्याखाली, पाऊस अजूनही कायम, रेड अलर्ट जारी

मुसळधार पावसाने वसई, विरार, नालासोपारा परिसराला झोडपून काढलं आहे. गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस या भागात

मुंबईत मुसळधार पाऊस, मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, पुढील 3 – 4 तास महत्वाचे, सखल भागात पाणी साचलं, रेल्वे वाहतुकीवर परिणाम

राज्यात मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना तडका दिला असून पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड,