पाणीटंचाईने अनेकांचे बुडाले रोजगार

३७ गाव पाड्यांना १२ टँकरने पाणीपुरवठा


मोखाडा : गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात धुवांधार पाऊस पडल्याने ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे पाणी टंचाईग्रस्त गावांच्या विहीरीत पाणी उपलब्ध होऊन टॅँकर ना विश्रांती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आजही तालुक्यातील ३७ गाव पाड्याना १२ खाजगी टँकरद्वारे दररोज पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावत असलेले पाणी टंचाईचे दृष्टचक्र थांबायचे नाव घेत नाही. तर शासनांची पाणी टंचाई निर्मुलनासाठी महत्त्वकांक्षी ठरणारी जलजिवन मिशन योजना घराघरात जरी पोहचलेली नसली तरी देखील ४ गाव पाड्यातील विहीरीत नळाद्वारे पाणी सोडून नागरिकांना दिलासा दिला जात आहे.


त्यामुळे एकीकडे कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. तसेच या पाणीटंचाईच्या दृष्टचक्रातून नागरिकांची सुटका कधी होईल अशी चर्चा होताना दिसत आहे. तसेच पाणीटंचाईमुळे नागरिकांना रोजगाराच्या कामांवर पण जाता येत नाही. टँकर पाणी घेऊन कधी येईल आणि आल्यानंतर विहीरीतील सोडलेले पाणी संपले तर मग काय करायचे या विचारांमुळे अनेकदा हातची कामे सोडून दिल्याचे नागरिक सांगतात. यामुळे पाणी टंचाईने अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.

Comments
Add Comment

भाजप एका जागेवरून ४३ जागांवर

बहुजन विकास आघाडीच्या ३७ जागा घटल्या विरार : वसई-विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने ७० जागा

वसई-विरारमधील विजयी उमेदवार

१ अ बविआ जयंत बसवंत १ ब बविआ अस्मिता पाटील १ क बविआ सुनंदा पाटील १ ड बविआ सदानंद पाटील   २ अ भाजप रिना वाघ २ ब

माजी नगरसेवकांच्या कोलांट उड्या ठरल्या फायद्याच्या

विरार : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन विकास आघाडी मधून काही माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश

वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच ‘धुरंधर’

महापालिकेच्या सभागृहात केली हॅटट्रिक गणेश पाटील विरार : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा हादरा

बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत, महापालिकेवर पुन्हा सत्ता

विरार :- वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या निकालात बहुजन विकास आघाडीने (बविआ) दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी