पाणीटंचाईने अनेकांचे बुडाले रोजगार

३७ गाव पाड्यांना १२ टँकरने पाणीपुरवठा


मोखाडा : गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात धुवांधार पाऊस पडल्याने ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहत होते. त्यामुळे पाणी टंचाईग्रस्त गावांच्या विहीरीत पाणी उपलब्ध होऊन टॅँकर ना विश्रांती मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आजही तालुक्यातील ३७ गाव पाड्याना १२ खाजगी टँकरद्वारे दररोज पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना भेडसावत असलेले पाणी टंचाईचे दृष्टचक्र थांबायचे नाव घेत नाही. तर शासनांची पाणी टंचाई निर्मुलनासाठी महत्त्वकांक्षी ठरणारी जलजिवन मिशन योजना घराघरात जरी पोहचलेली नसली तरी देखील ४ गाव पाड्यातील विहीरीत नळाद्वारे पाणी सोडून नागरिकांना दिलासा दिला जात आहे.


त्यामुळे एकीकडे कायमस्वरूपी पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. तसेच या पाणीटंचाईच्या दृष्टचक्रातून नागरिकांची सुटका कधी होईल अशी चर्चा होताना दिसत आहे. तसेच पाणीटंचाईमुळे नागरिकांना रोजगाराच्या कामांवर पण जाता येत नाही. टँकर पाणी घेऊन कधी येईल आणि आल्यानंतर विहीरीतील सोडलेले पाणी संपले तर मग काय करायचे या विचारांमुळे अनेकदा हातची कामे सोडून दिल्याचे नागरिक सांगतात. यामुळे पाणी टंचाईने अनेकांचे रोजगार बुडाले आहेत.

Comments
Add Comment

माजी आयुक्तांच्या अटकेचे पुरावे दाखवा

कारागृहातील मुक्काम वाढला बांधकाम प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले पालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार,

'चिकन लॉलीपॉप'ने घेतला सात वर्षांच्या मुलाचा जीव, पालघरमध्ये खळबळ

पालघर: मुंबईला लागून असलेल्या महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे चिकन लॉलीपॉप

रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी एकमेकांकडे बोट

पालिका, बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली विरार : रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे नुकतेच विरारमध्ये एका व्यक्तीचा

वसईत गरबा खेळताना हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

नवरात्रोत्सवातील जल्लोषात हृदयद्रावक घटना वसई : वसईत नवरात्रोत्सवाच्या उत्साहात एक हृदय हेलावून टाकणारी घटना

खाजगीकरणा विरोधात वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने; ९ ऑक्टोबरला संपाचा इशारा

पालघर : वीज कंपन्यांमधील खाजगीकरण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते आणि

Vasai Factory Fire: वसईत कारखान्याला भीषण आग

वसई: वसईत तुंगारेश्वर फाटा येथील पुठ्ठा कारखान्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कारखान्यातील अनेक