GDP : भारतीय अर्थव्यवस्थेची दमदार कामगिरी

नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरच्या तिमाहीत म्हणजे जानेवारी ते मार्च या कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करताना दिसली आहे. या कालावधीत देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) तब्बल ७.४ टक्के वाढ नोंदवण्यात आली. ही वाढ मागील चार तिमाहींमधील सर्वात उच्चांकी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी एकूण जीडीपी वाढ ६.५ टक्क्यांवर स्थिरावली. या आकडेवारीची अधिकृत घोषणा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) आणि सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने आज, शुक्रवारी केली.


जरी तिमाहीत अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली असली, तरीही संपूर्ण वर्षासाठीची ६.५ टक्के वाढ ही मागील चार वर्षांतील सर्वात कमी नोंदवली गेलेली जीडीपी वाढ आहे. यापूर्वी २०२१-२२ या वर्षात जीडीपी वाढ ९.७ टक्के होती, तर २०२२-२३ मध्ये ७.६ टक्के आणि २०२३-२४ मध्ये ९.२ टक्के वाढ झाली होती. या तुलनेत चालू वर्षातील वाढ कमी असली तरी काही क्षेत्रांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे.



विशेषतः कृषी क्षेत्राने या आर्थिक वर्षात ४.६ टक्क्यांची वाढ नोंदवली असून, ही वाढ मागील वर्षीच्या २.७ टक्क्यांच्या तुलनेत खूपच सकारात्मक मानली जात आहे. त्याचबरोबर या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कृषी क्षेत्रातील वाढ ५.४ टक्के इतकी झाली, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ०.९ टक्क्यांनी अधिक आहे.


बांधकाम क्षेत्रानेही चांगली कामगिरी करत यावर्षी ९.४ टक्के वाढ गाठली. त्याचप्रमाणे सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवा क्षेत्रांनी ८.९ टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. वित्तीय सेवा, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा क्षेत्रांची वाढ ७.२ टक्क्यांवर पोहोचली आहे. या सर्व क्षेत्रांतील सुधारणा ही एक सकारात्मक संकेत मानली जात आहे.


जागतिक स्तरावर अमेरिका आणि इतर देशांच्या टॅरिफ धोरणांमुळे तसेच रशिया-युक्रेन युद्धामुळे व्यापारात अडथळे निर्माण झाले. तरीही भारतात ग्रामीण भागातील वाढती मागणी आणि सरकारी खर्चातील वाढ यामुळे अनेक आव्हानांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने आपले अस्तित्व ठामपणे टिकवून ठेवले आहे. त्यामुळे आगामी तिमाहींसाठी अर्थव्यवस्थेचा वेग असाच टिकून राहण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

Goregaon-Mulund Link Road (GMLR) : दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्‍यान उड्डाणपूल १५ जुलैपर्यंत होणार खुले?

मुंबई : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत दिंडोशी न्यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यान

West Bengal Earthquake : पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; सिलीगुडी, कूचबिहार हादरले, रिक्टर स्केलवर ५.६ तीव्रतेची नोंद

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये रविवारी रात्री भूकंपाचे (Earthquake) तीव्र धक्के जाणवले. सिलीगुडी (Siliguri) आणि कूचबिहार (Cooch

Iran-Hezbollah Attack on Israel : इस्रायलवर एकाच वेळी दोन बाजूंनी हल्ला; इराणचा थेट इशारा, 'प्रत्युत्तर दिल्यास विध्वंस अटळ'

Iran-Hezbollah Attack on Israel : मध्य पूर्वेतील (Middle East) परिस्थिती पुन्हा एकदा स्फोटक बनली आहे. लेबनॉनवरील (Lebanon) इस्रायली हल्ल्यांच्या

Buldhana 'Fake Murder Case' : राजुर 'फेक मर्डर केस' गाजली; तपासातील हलगर्जीपणामुळे दोन PI निलंबित

बुलढाणा : राज्यभर चर्चेत असलेल्या जळगाव जामोद येथील कथित बनावट हत्याकांड (Fake Murder Case) प्रकरणात तपासातील गंभीर

NCP Rajendra Jain : राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी; 'पक्षाचा विश्वास सार्थ ठरवणार', राजेंद्र जैन यांची प्रतिक्रिया

मुंबई : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राज्यसभा (Rajya Sabha) जागेसाठी राष्ट्रवादी

Online Fraud : ॲपच्या नादात फ्लॅट पडला महागात ....

मुंबई : मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या हक्काचं घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण वाढत्या महागाईमुळे