मंत्री नितेश राणेंनी घेतली वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती

कुडाळ प्रतिनिधी : मंत्री नितेश राणेंनी कुडाळच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाला भेट दिली तसेच वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजेच्या पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात मंत्री नितेश राणेंनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. वीज वितरण कंपनीच्या नियंत्रण कक्षाच्या कामाची पद्धत समजून घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कामकाजात सुधारणा करण्यासाठी काही सूचना दिल्या.

मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावांचा विजेचा पुरवठा अनेक तासांसाठी खंडीत झाला होता. या घटनेची जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने नितेश राणे यांनी गंभीर दखल घेतली. यानंतर मंत्री नितेश राणेंनी कंपनीला कुडाळमध्ये तातडीने नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले. कंपनीने नियंत्रण कक्ष स्थापन केल्यानंतर या कक्षाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी कुडाळमध्ये कंपनीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कक्षाकडे किती तक्रारी आल्या आणि त्यातील किती सोडवल्या गेल्या तसेच कशा प्रकारे सोडवल्या गेल्या याची माहिती घेतली. यनंतर मंत्री नितेश राणेंनी कंपनीला कामकाज सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या.



कार्यकारी अभियंता वनमोरे यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. नियंत्रण कक्षाचे कामकाज अजून सुधारले पाहिजे, आलेली तक्रार संबंधितांपर्यंत तात्काळ जाणे अपेक्षित आहे यामध्ये कोणताही विलंब होऊ देऊ नका तसेच अनेक तास विद्युत पुरवठा खंडित राहू नये याकडे लक्ष द्या अशा सूचना दिल्या असे मंत्री नितेश राणे म्हणाले. याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी तसेच महावितरण कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण