आता घरबसल्या उपलब्ध होणार शासकीय सेवा

  28

एमएमआरडीएचे ऑनलाईन आरटीएस पोर्टल 


मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए)आरटीएस अणि इंओडीची विविध वि डिजिटल परिवर्तन घडवत नागरिक सेवा गतिमान केल्या आहेत, एमएमआरडीएने ऑनलाईन 'सेवा हक्क पोर्टल (आरटीएस पोर्टल) सुरू केले आहे.


पारदर्शक आणि नागरिककेंद्री प्रशासनाच्या दिशेने में एक मोठे पाऊल आहे. या एकीकृत डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांना महत्त्वाच्या १५ नागरी सेवांचा सुलभअॅक्सेस प्राप्त होईल. यामुळे आता एका क्लिकवर सर्व शासकीय सेवा उपलब्ध होणार आहेत. या पोर्टलमुळे सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएचे अध्यक्ष, एकनाथ शिंदे यांच्या द्रष्ट्या नेतृत्यांतर्गत आणि डॉ. संजय मुखर्जी महानगर आयुक्त यांच्या पुढाकाराने साकारण्यात आलेले हे पोर्टल म्हणजे मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) सेवा वितरणात करण्यात आलेल्या एका परिवर्तनीय बदलाची नांदी आहे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते या आरटीएस पोर्टलचे उद्%E2%80%8Cद्घाटन करण्यात आले.


यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल, भाप्रसे एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त वस्तिक कुमार पाण्डेय भाश्रनो आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ या अधिनियमाशी हा उपक्रम पूर्णतः सुसंगत असून, नागरिकांना जलद, पारदर्शक आणि जबाबदारीने सेवा देण्याच्या एमएमआरडीएच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. या पोर्टलमुळे सरकारी कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरन कमी होणार असून सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध होणार आहेत. आरटीएस पोर्टलमुळे नागरिकांना कधीही व कुठूनही विविध सेवांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची, अर्जाची स्थिती थेट पाहण्याची आणि तत्काळ सूचना मिळण्याची सुविधा मिळते, या पोर्टलमुळे सरकारी कार्यालयांतील गदीं लक्षणीय प्रमाणात कमी होईल.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.