निरा डावा कालवा फुटल्याने शेतात, घरात पाणी शिरुन नागरिकांचे नुकसान

शेतकऱ्यांना मदत करणार असल्याची उपपमुख्यमंत्त्री अजित पवार यांची माहिती


बारामती : मागील तीन-चार दिवसांत बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यातच भर म्हणून बारामतीतून वाहणारा निरा डावा कालवा फुटल्याने अनेक नागरिकांच्या घरात व शेतात पाणी जाऊन नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर गुरुवारी (दि. २९) रोजीही त्यांनी बारामती तालुक्यात ठिकठिकाणी पाहणी करून पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.


उपमुख्यमंत्री पवार गुरुवारी बारामती दौऱ्यावर होते. बारामती तालुक्यातील सिद्धेश्वर निंबोडी या गावासह अन्य गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यादरम्यान पवारांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व अधिकाऱ्यांना तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या. ज्या नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले आहे. त्यांना १० हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करून पंचनामे सुरू आहेत.


बारामतीसह राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना थोडी कळ काढावी लागेल! हे एका झटक्यात होणार नाही. मी सातत्याने याबाबत माहिती घेत आहे. शेतकऱ्यांचे जेवढे नुकसान झाले आहे. शक्य तेवढी मदत आम्ही करणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.


सिद्धेश्वर निंबोडी येथे पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यामध्ये रस्ता, ब्रीज, कोसळलेली घरं आणि वीज खांब, वाहून गेलेले रस्ते आदींचा समावेश आहे. यादरम्यान शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या समस्या समजून घेतल्या. यावेळी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासनही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले

Comments
Add Comment

Sunetra Pawar : सासवड-जेजुरी मार्गावरील अपघातानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रुग्णालयात; जखमी वारकऱ्यांना दिला धीर, तातडीच्या उपचाराचे आदेश

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यादरम्यान सासवड–जेजुरी मार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने वारकरी

Asmita Katkar death case : मुलगा होईल म्हणून कपडे घेतले आणि...; अस्मिता काटकर मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण! आई-वडिलांचे सासरच्यांवर गंभीर आरोप

कोल्हापूर : कोल्हापुरातील राजारामपुरी परिसरात एका महिन्याच्या चिमुकलीच्या आईने आत्महत्या केल्याच्या घटनेने

Ashadhi Wari Accident : जेजुरीजवळ पालखी सोहळ्यात अपघात; टेम्पोच्या धडकेत ३ वारकरी महिलांचा मृत्यू, ४ वारकरी जखमी

जेजुरी : आषाढी वारी (Ashadhi Wari) सोहळा सुरू असतानाच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी (Palkhi) मार्गावर मोठी दुर्घटना (Accident)

Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची उघडीप कायम; 'या' तारखेनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून २१ जुलैनंतर पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता; जुलैअखेर चांगल्या पावसाचा अंदाज राज्यात पुन्हा एकदा

Ashadhi Wari 2026 : वारीत वाटण्यासाठी आणलेल्या शीतपेयामुळे २ परिचारिकांना विषबाधा; अन्न व औषध प्रशासनाची तातडीची कारवाई

धाराशिव : धाराशिवमध्ये शेगावच्या संत गजानन महाराजांच्या वारीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आहे. भाविकांना

Ashadhi Wari 2026 : पालखी सोहळ्यात चोरांचा धुमाकूळ! ६७ महिला, २२ पुरुषांसह ८९ संशयित पोलिसांच्या ताब्यात

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात (Palkhi Procession) लाखो वारकरी