Mumbai-Goa highway : कशेडी घाटात भेगा, नव्या मुंबई-गोवा महामार्गावर भूस्खलनाचा धोका वाढला

  125

पोलादपूर : जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील कशेडी घाटात भेगा पडल्याने आणि मंगळवारी सायंकाळी खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारी मार्गावर मोठमोठे दगड कोसळल्याने नव्या महामार्ग क्रमांक ६६ वर भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.


कोंढवी फाट्याजवळ जुन्या महामार्गावर भेगा पडलेल्या ठिकाणी संभाव्य धोक्याची सूचना देणाऱ्या पताका लावण्यात आल्या असून, वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या भेगांमुळे जुना महामार्ग खचून तो थेट नव्या महामार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.



दरम्यान, कातळी भोगावच्या हद्दीत भुयारी मार्ग पूर्ण होताच, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत चार ते सहा मोठे दगड पडल्याचे मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी माहिती दिली.


या पार्श्वभूमीवर जुना रस्ता तातडीने फोडून संरक्षक उपाययोजना केल्या नाहीत, तर नव्या महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Red Soil Stories चे सुप्रसिद्ध यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन, वयाच्या ३३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कोकणातील खाद्यसंस्कृती यूट्यूब व्हिडीओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणारे सुप्रसिद्ध Red Soil Stories चे युट्युबर

गणेशभक्तांचा रेल्वे प्रवास अधिक सुखकर करा!

खा. नारायण राणे यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन विशेष गाड्या,अधिकचे कोच जोडण्याची केली मागणी नवी दिल्ली :

सिंधुदुर्गमध्ये महाराष्ट्राचा पहिला काचेचा पूल सज्ज! नापणे धबधब्यावर पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण, कोकण पर्यटनाला नवी झळाळी

सिंधुदुर्ग: कोकणच्या निसर्गरम्य सिंधुदुर्ग जिल्ह्यात, पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारे एक महत्त्वाचे

अभय योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

आयुक्त मंगेश चितळे यांचे आवाहन पनवेल : मालमत्ता करांवरील शास्तीमध्ये सवलत देत पनवेल महापालिकेने दिनांक १८ जुलै

Reservation Chart : आता ट्रेन सुटण्याच्या ८ तास आधी पाहायला मिळणार आरक्षण चार्ट, 'या' दिवसापासून सेवा सुरूवात

मुंबई : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आणि त्यांचा प्रवास अधिक चांगल्या पद्धतीने

मुंबई-गोवा महामार्ग पंधरा वर्षे का रखडला? प्रवाशांना १ कोटीचा विमा आणि नुकसान भरपाईसाठी नितीन गडकरींना थेट पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दीर्घकाळ रखडलेल्या कामांमुळे त्रस्त झालेल्या कोकणवासीयांनी