Mumbai-Goa highway : कशेडी घाटात भेगा, नव्या मुंबई-गोवा महामार्गावर भूस्खलनाचा धोका वाढला

पोलादपूर : जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील कशेडी घाटात भेगा पडल्याने आणि मंगळवारी सायंकाळी खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारी मार्गावर मोठमोठे दगड कोसळल्याने नव्या महामार्ग क्रमांक ६६ वर भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.


कोंढवी फाट्याजवळ जुन्या महामार्गावर भेगा पडलेल्या ठिकाणी संभाव्य धोक्याची सूचना देणाऱ्या पताका लावण्यात आल्या असून, वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या भेगांमुळे जुना महामार्ग खचून तो थेट नव्या महामार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.



दरम्यान, कातळी भोगावच्या हद्दीत भुयारी मार्ग पूर्ण होताच, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत चार ते सहा मोठे दगड पडल्याचे मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी माहिती दिली.


या पार्श्वभूमीवर जुना रस्ता तातडीने फोडून संरक्षक उपाययोजना केल्या नाहीत, तर नव्या महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

मुंबई-विजयदुर्ग 'रोरो' सेवेचा आजपासून श्रीगणेशा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई: कोकणची लाल माती आणि अथांग अरबी समुद्र यांचे नाते आता अधिक घट्ट होणार आहे. गेल्या अनेक दशकांपासून ज्या

Narayan Rane : "आमच्यात कटुता असली तरी जिव्हाळा कायम!" भास्कर जाधवांनी व्यक्त केली राणे साहेबांबद्दलची कृतज्ञता;

'त्या' घटनेनंतर जुन्या आठवणींना उजाळा चिपळूण : राजकारणात एकमेकांवर तुटून पडणारे नेते, वैयक्तिक आयुष्यात

फोंडाघाटचा ‘किऱ्याचा आंबा’ होणार जमीनदोस्त

कणकवली : फोंडाघाट, हवेलीनगर येथील शेकडो वर्षांपूर्वीचे ऐतिहासिक अधिष्ठान आणि मार्गदर्शक आख्यायिका, तसेच

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

उद्यापर्यंत ब्लॉक रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले असून पुढील

‘वलसाड हापूस’ या नावाने स्वतंत्र मानांकनांसाठी गुजरात प्रयत्नशील

मुंबई : हापूस आंबा म्हटले की, कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा गोड, चविष्ट आणि सुवासिक आंबा सर्वांच्या

Anganewadi Jatra 2026 : भराडी देवीचा 'कौल' मिळाला! लाखो भाविकांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम; आंगणेवाडी जत्रेची तारीख अखेर ठरली!

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि कोकणातील सर्वात महत्त्वाची यात्रा समजल्या जाणाऱ्या मालवण