घरकुल योजनेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर

  55

मुरबाड : मुरबाडजवळील देवराळवाडीवरील भरत भस्मा याचे कुडाचे घर अतिवृष्टीत कोसळले. घरातील अख्खं कुटुंब गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यातील घरकुल योजनेचा घोटाळा चव्हाट्यावर आला आहे.


घरकुल योजनेचा लाभ धनदांडग्यांनी लाटल्यामुळे गरजू लाभार्थ्यांना घरासाठी वणवण करावी लागत आहे. आदिवासी गरीब भस्मा कुटुंबाला वेळीच घरकुलाचा लाभ मिळाला असता तर हा अनर्थ टळला असता अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या.


भस्मा कुटुंबाचे कुडाचे घर अतिवृष्टीने कोसळल्यानंतर बोगस घरकुल योजनेच्या चौकशीची मागणी जोर धरत आहे. तालुक्यातील पोटगावपासून पाटगावपर्यंत, शेलगाव-शाईपासून सावर्ण- मेर्दी माळशेज घाट माथ्यापर्यंत असलेल्या तालुक्यातील सर्व बोगस घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भोईर यांनी केली आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या