तपास एसआयटीकडे द्यावा, वैष्णवीच्या वडिलांची मागणी

पुणे : वैष्णवीला ज्या दिवशी बेदम मारहाण करण्यात आली त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला, असे शवविच्छेदन अहवाल अर्थात पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सांगतो. याचा अर्थ संगनमताने कट रचून वैष्णवीची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) करुन घ्यावा, अशी मागणी वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी केली आहे.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या केली त्या दिवशीही तिला बेदम मारहाण झाली होती. वैष्णवीच्या मृतदेहावार एकूण २९ जखमा आढळल्या. यातील १५ जखमा या मृत्यूआधीच्या २४ तासांतील असल्याचे पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद आहे. बावधन पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी तपास विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) करुन घ्यावा, अशी मागणी केली आहे.

शरीरारावरील जखमांबाबत पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये नमूद माहितीनुसार ज्या दिवशी वैष्णवीने आत्महत्या त्या दिवशी तिला बेदम मारहाण झाली होती. तसेच याआधीही वारंवार मारहाण होतच होती. कधी पाईप तर कधी गज वापरुन मारहाण करण्यात आली होती. वैष्णवीचा वारंवार शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. छळ करुन वैष्णवीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत अर्थात स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमकडून (एसआयटी) तपास करुन घेतला तर दोषींना शिक्षा होईल, अशी आशा वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी व्यक्त केली.
Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास