मविआ गेली खड्ड्यात...राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार; ठाकरेंच्या नेत्याची थेट धमकी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू, अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे (Bala Darade) यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असंही दराडे म्हणाले आहेत. मविआ गेली खड्ड्यात, (आमच्यासाठी) आधी सावरकर आणि हिंदुत्व असं वक्तव्यही दराडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.




काय म्हणाले दराडे ?


राहुल गांधी यांनी दोनवेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांन माफीवीर म्हणून संबोधलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना ठाकरी शैलीमध्ये सुनावलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही. आता नाशिकमधील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांना समन्सही बजावण्यात आला आहे. राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू. आणि त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, असा थेट इशारा दराडे यांनी दिला. सावकरांबद्दल केलेलं कोणतंही वक्तव्य खपवून घेणार नाही, सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही राहुल गांधी यांना धडा शिकवू...जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, असंही बाळा दराडे म्हणाले.


बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे उपमहानगर प्रमुख आहेत. काँग्रेस नेते, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल सातत्याने जी वक्तव्य करत आहेत, ती आम्ही खपवून घेणार नाही. आमच्यासाठी हिंदुत्व आणि सावरकर आधी येतात, असा पुनरुच्चार दराडे यांनी केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आता चांगलेच आक्रमक झालेले दिसत असून याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

मुंबईचा पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्ग पावसाळ्यापूर्वी समतल करा; उपमहापौरांची आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई: मुंबई महानगरातील रस्त्यांची स्थिती अधिक सुधारण्यासाठी पश्चिम व पूर्व द्रुतगती महामार्ग तसेच प्रमुख