मविआ गेली खड्ड्यात...राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळं फासणार; ठाकरेंच्या नेत्याची थेट धमकी

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) नाशिकमध्ये आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासू, अशी थेट धमकी महाविकास आघाडीमधील ठाकरे गटाचे नाशिक उपमहानगर प्रमुख बाळा दराडे (Bala Darade) यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपवून घेणार नाही असंही दराडे म्हणाले आहेत. मविआ गेली खड्ड्यात, (आमच्यासाठी) आधी सावरकर आणि हिंदुत्व असं वक्तव्यही दराडे यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.




काय म्हणाले दराडे ?


राहुल गांधी यांनी दोनवेळा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, त्यांन माफीवीर म्हणून संबोधलं. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना ठाकरी शैलीमध्ये सुनावलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्धचे अपशब्द सहन करणार नाही. आता नाशिकमधील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. त्यांना समन्सही बजावण्यात आला आहे. राहुल गांधी हे जर नाशिकमध्ये आले तर आम्ही आमच्या ठाकरी शैलीमध्ये, शिवसैनिकांच्या स्टाईलमध्ये त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करू. आणि त्यांच्या तोंडाला आम्ही काळं फासू, असा थेट इशारा दराडे यांनी दिला. सावकरांबद्दल केलेलं कोणतंही वक्तव्य खपवून घेणार नाही, सावरकरांबाबत अपशब्द वापरल्यास आम्ही राहुल गांधी यांना धडा शिकवू...जरी आम्ही महाविकास आघाडीमध्ये असलो तरी, महाविकास आघाडी खड्ड्यात गेली, असंही बाळा दराडे म्हणाले.


बाळा दराडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नाशिकचे उपमहानगर प्रमुख आहेत. काँग्रेस नेते, राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल सातत्याने जी वक्तव्य करत आहेत, ती आम्ही खपवून घेणार नाही. आमच्यासाठी हिंदुत्व आणि सावरकर आधी येतात, असा पुनरुच्चार दराडे यांनी केला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आता चांगलेच आक्रमक झालेले दिसत असून याच पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनरचा अपघात, चालक जखमी

ठाणे : कॅडबरी जंक्शन उड्डाणपुलाजवळ कंटेनरचा अपघात झाला. या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला. जखमी चालकाला ठाणे

महाराष्ट्रासाठी पुढील २४ तास महत्त्वाचे! कुठे कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या सविस्तर

मुंबई: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नोव्हेंबर उजाडला तरी

टाटा मिनी बसचा अपघात, गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावला निघालेल्या दोघांचा मृत्यू

कर्जत : समृद्धी महामार्गावर कर्जतजवळ बोगद्यात टाटा मिनी बसचा अपघात झाला. चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे

गणेश काळेच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक, शस्त्रे जप्त

पुणे : कोंढवा परिसरात गणेश काळे या रिक्षाचलकाची हत्या करण्यात आली. गणेशवर आधी गोळीबार केला गेला नंतर अतिशय जवळून

पुण्यात आंदेकर टोळीची दहशत! टोळीतील सर्वजण तुरुंगात, हत्या करतंय कोण?

पुणे: पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीचा प्रमुख आणि त्याचे इतर साथीदार सध्या तुरुंगात आहेत. तरीसुद्धा वनराज

ऐतिहासिक महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका

नवी मुंबई : महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना (फायनल मॅच) नवी मुंबईच्या डी. वाय पाटील