सरळ सेवा भरतीतील सहायक अभियंत्यांची यादी होणार जाहीर

मुंबई : महावितरणकडून सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण/स्थापत्य) ३४२ उमेदवारांची सहायक अभियंता पदासाठीची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. या निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान अपात्र व गैरहजर तसेच नियुक्तीपत्रातील विहीत मुदतीमध्ये रुजू न झालेल्या उमेदवारांच्या प्रमाणात महावितरण कंपनीच्या नियमाप्रमाणे प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणानुसार प्रतीक्षा यादी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.



महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रतीक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल. महावितरणच्या जाहिरात क्र. ०७/२०२३ अन्वये अभियांत्रिकी पदवीधारक (वितरण-३०२ व स्थापत्य-४०) सहायक अभियंता पदाच्या ३४२ जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली आहे. त्याप्रमाणे दि. १४ जानेवारी २०२५ रोजी सहायकअभियंता पदासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली.



कनिष्ठ अभियंतापदी ९१ उमेदवारांना नियुक्तिपत्र


कनिष्ठ अभियंतापदी अभियांत्रिकी पदविकाधारक ९१ उमेदवारांची निवड प्रक्रिया नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार सरळ सेवा भरतीद्वारे ७२ तर अनुकंपा तत्त्वानुसार १९ उमेदवांराची निवड करण्यात आली आहे. अर्जासोबत या उमेदवारांना परिमंडलस्तरावर नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,