आपत्कालीन परिस्थितीत सर्व यंत्रणा 'अलर्ट मोड'वर

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश


अलिबाग  :रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. सध्याची पावसाची आकडेवारी पाहता, संभाव्य आपत्तींना यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी सर्व यंत्रणानी सदैव दक्ष राहावे. सर्व दरड क्षेत्रात येणारी गावे, जुने व धोकादायक पूल, साकव आणि पाणीसाठे यांची सर्व विभागांनी पाहणी करून अहवाल सादर करावा. आवश्यकतेनुसार सर्वांनी कार्यवाही करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.



यंदा पूल अथवा रस्ता दुर्घटना घडल्यास संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही तटकरे यांनी यावेळी दिला. जिल्ह्यात निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीचा आढावा, खबरदारी व जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी मंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा क्षेत्र, तसेच जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली होती. आपत्ती निवारण ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगून आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, रायगड जिल्ह्यातील दरड प्रवण क्षेत्राचे नव्याने मॅपिंग करणे गरजेचे आहे. अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयास अहवाल सादर करावेत असे निर्देश तटकरे यांनी दिले.

या बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अलिबाग उपवन संरक्षक राहुल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक निशिकांत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
Comments
Add Comment

Nashik : संतापजनक ! समाजकंटकांकडून एक एकर उभी कारल्याची बाग उद्ध्वस्त ! शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान

Nashik : नाशिकच्या येवला तालुक्यातील धुळगाव येथे संतापजनक प्रकार समोर आला आहे. धुळगाव येथील एका कष्टकरी

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Nashik : कोथिंबिरीच्या जुडीला तब्बल २८५ रुपये; पालेभाज्यांचे भाव गगनाला

Nashik : पावसाने ओढ दिल्यामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून त्याचा थेट परिणाम पालेभाज्यांच्या दरावर झाला आहे. नाशिक

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक