मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले

शेतीसह अलिबाग शहरही पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत


अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना तुफानी पावसाने चांगलेच झोडपून काढल्याने गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात एकुण सरासरी सरासरी १६०.४५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.


अलिबाग शहर समुद्रकिनारी असल्याने आणि दुसरीकडे समुद्राला मोठी भरती असल्याने अलिबाग शहरातील रस्ते, भाजी बाजारपेठ, पीएनपी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चेंढरे बायपास, अलिबाग ते पिंपळभाट दरम्यानचा रस्ता, शहरातील नाले, चेंढरे हद्दीतील नाले दुथडी भरून वाहताना दिसून येत होते.



दुसरीकडे अलिबाग शहरासह जवळील चेंढरे हद्दीतील नाल्यांची व्यवस्थित सफाई न झाल्याने पाण्याबरोबरच नाल्यांतील कचरा रस्त्यांवर वाहून आल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात उन्हाळ्यात रस्त्यावरील खड्डे न भरले गेल्याने त्यात पावसाचे पाणी साचल्याने त्याचा विविध प्रकारच्या वाहन चालकांना त्रास सुरु झाल्याचे चित्र दिसून येत होते.



जिल्ह्यात पंचनामा करण्याचे काम सुरू


दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी प्रवाहात वाहत आहेत. दुसरीकडे गेल्या तीन दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे घरे, आरोग्य केंद्र, स्मशानभूमी, मच्छीमार सोसायटी, पोल्ट्रीसह गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत एकूण १३ कच्च्या घरांचे, २६० पक्क्या घरांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन आरोग्य केंद्र, दोन स्मशानभूमी, एक मच्छिमार सोसायटी एक पोल्ट्री व
इतर पाच सार्वजनिक मालमत्तांचे समावेश आहे.



तालुक्यांमध्ये पावसाची नोंद 


अलिबागला २४१, मुरुडला २५१, पेणला १६०, पनवेलला २४५.२, उरणला १००, कर्जतला १०३, खालापुरला १२३, माथेरानला १५२, सुधागडला १०२, माणगावला १३६, तळा १७४, महाडला ७८, पोलादपूरला ११८, श्रीवर्धनला १७०, म्हसळ्याला २८२, रोह्याला १३२ असा एकूण २५६७.२ मिलीमीटर (सरासरी १६०.४५) पाऊस पडला. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील सखल भाग, रस्ते, शेती आजही पाण्याखाली असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Comments
Add Comment

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

BMC Election Results : २२७ वॉर्डांचे निकाल एकाच वेळी नाहीत, टप्प्याटप्प्याने मतमोजणी

मुंबई : राज्यभरात महापालिका निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले असून, मुंबई महापालिकेच्या (BMC) निकालांकडे संपूर्ण

मराठी भाषेबाबतचा भाजपाचा दृष्टीकोन व्यापक -प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

विरोधकांची मराठी भाषेबाबतची भूमिका नकारात्मक मुंबई :  भाजपाचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी

वर्षभरात १ लाख व्हिसा रद्द; नियम मोडणाऱ्यांना दणका

८ हजार भारतीय विद्यार्थ्यांवरही टांगती तलवार नवी दिल्ली : अमेरिकेला अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि बेकायदेशीर

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन