५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान

...... ५३८ हेक्टरवरील पिकेही बाधित


पालघर : पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांना चांगलाच फटका बसला आहे. ५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या २ हजार १६३ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, १ हजार ९२३ शेतकऱ्यांच्या ५३८ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री. नितेश राणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. जिल्ह्यात सहा व सात मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे २ हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. त्याचप्रमाणे धाकटी डहाणू येथील ९८ बोटींसह १०२ बोटीचे नुकसान झाले आहे.



वसई तालुक्यातील अर्नाळा गाव, अर्नाळा किल्ला, पाचूबंदर तसेच पालघर तालुक्यातील ३ गावांमधील सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सुक्या मासळीचे नुकसान झाले आहे.घरांचे, शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्यामुळे सर्वे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले होते. नुकसानीचा सर्वे पूर्ण झाला असून वादळी वारा व पावसाचा फटका सर्वाधिक फळबागांना बसला आहे. २ हजार १६३ हेक्टर वरील फळबागांचे नुकसान वादळी वारा व पावसामुळे झाले आहे.


तसेच शेती पिकांसह घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, मच्छीमार बांधवांना शासकीय मदत त्वरित मिळावी म्हणून, पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ कोटींच्या निधीची मागणी केली आहे.



शुक्रवारच्या पावसाने १०३० घरांचे नुकसान


तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुद्धा जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील १०३० घरांचे नुकसान झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना सुद्धा लवकरच मदत करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

ई-गव्हर्नन्स मूल्यमापनात वसई–विरार पालिकेचा ‘नववा क्रमांक’ कायम

पालघर :  राज्यातील महानगरपालिकांच्या ई-गव्हर्नन्स कामकाजाच्या मूल्यमापनात वसई–विरार महानगरपालिकाने यंदाही

Virar: दारूच्या नशेत सापासोबत मस्ती बेतली जीवावर; विरारमध्ये तरुणाचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू

विरार: दारूच्या नशेत विषारी जातीच्या सापाला पकडणे आणि अति उत्साहाच्या भरात सापसोबतच मस्ती करणे विरार येथील एका

वसई-दिवा मार्गावर मेगाब्लॉक, शनिवारी आणि रविवारी प्रवाशांचे हाल

वसई : दिवा-वसई रोड मार्गावरील खारबाव (Kharbav) स्थानकात नवीन अप आणि डाऊन मालवाहू मार्गिकांच्या कामासाठी शनिवार आणि

धक्राकादायक! १५ वर्षाच्या भाच्याकडून आत्याचा खून

वसई : वसई परिसरामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रागाच्या भरात एका १५ वर्षीय मुलाने आपल्या आत्याचा खून

सत्तेचे गणित बिघडले; बेरजेचे गणित जमले

गणेश पाटील, विरार : वसई-विरारमध्ये एकापेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची राजकीय शक्ती नसलेल्या भाजपने यावेळी

पाण्याच्या टाकीत मानवी हाडांचा सापळा

वसईच्या माणिकपूर गावातील घटना वसई : वसईच्या माणिकपूर येथील एका चाळीच्या रिकाम्या पाण्याच्या टाकीत पुरुषाच्या