५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान

...... ५३८ हेक्टरवरील पिकेही बाधित


पालघर : पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फळबागांना चांगलाच फटका बसला आहे. ५ हजार ६०० शेतकऱ्यांच्या २ हजार १६३ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले असून, १ हजार ९२३ शेतकऱ्यांच्या ५३८ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत मिळावी म्हणून पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री. नितेश राणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. जिल्ह्यात सहा व सात मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे २ हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. त्याचप्रमाणे धाकटी डहाणू येथील ९८ बोटींसह १०२ बोटीचे नुकसान झाले आहे.



वसई तालुक्यातील अर्नाळा गाव, अर्नाळा किल्ला, पाचूबंदर तसेच पालघर तालुक्यातील ३ गावांमधील सुक्या मासळीचा व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या सुक्या मासळीचे नुकसान झाले आहे.घरांचे, शेती पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्यामुळे सर्वे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले होते. नुकसानीचा सर्वे पूर्ण झाला असून वादळी वारा व पावसाचा फटका सर्वाधिक फळबागांना बसला आहे. २ हजार १६३ हेक्टर वरील फळबागांचे नुकसान वादळी वारा व पावसामुळे झाले आहे.


तसेच शेती पिकांसह घरांची सुद्धा मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना, मच्छीमार बांधवांना शासकीय मदत त्वरित मिळावी म्हणून, पालकमंत्री गणेश नाईक यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ कोटींच्या निधीची मागणी केली आहे.



शुक्रवारच्या पावसाने १०३० घरांचे नुकसान


तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे सुद्धा जव्हार आणि विक्रमगड तालुक्यातील १०३० घरांचे नुकसान झाले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना सुद्धा लवकरच मदत करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम सुरू होण्याच्या दिशेने एक पाऊल

चार तासांचा प्रवास केवळ दीड तासांत होणार मुंबई  : गेल्या ९ वर्षांपासून रखडलेल्या विरार-अलिबाग कॉरिडोरचे काम

खासदार डॉ. सवरा पालघरचे निवडणूक प्रभारी

आमदार राजन नाईक वसई-विरारचे निवडणूक प्रमुख पालघर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनाच्या कर्जास शासन हमी

मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिकेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला

पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घेण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

मुंबई : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील

वसई विरार महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणास गती

विरार, विराट नगर, ओस्वालनगरी नालासोपारा, अलकापुरी, उमेळमान या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे नियोजन मुंबई : वसई

वसईत बर्डपार्क उभारण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक सरसावले!

मुंबई : वसई विरार महापालिकेच्या हद्दीत बर्ड पार्क उभारण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. या पार्कमध्ये पक्षांना