Building Collaps in Thane: ठाण्यात जुन्या इमारतीचा भाग कोसळला; १७ कुटुंबांचे स्थलांतर

  67

ठाणे:  ठाण्यातील वागळे इस्टेटमधील किसननगर परिसरातील नंदादीप इमारतीचा भाग कोसळल्याची घटना (Building Collapses in Thane) घडली. पंचपरमेश्वर मंदिराजवळील नंदादीप या ५० वर्ष जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


तीन मजली असलेल्या नंदादीप इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग रात्री अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.



इमारत अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये


महाराष्ट्रात मान्सूनच्या मुसळधार पावसादरम्यान, ठाणे शहरात मंगळवारी पहाटे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, ज्याला नागरी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच धोकादायक म्हणून वर्गीकृत केले होते. ही घटना वागळे इस्टेट परिसरातील असून, भरपावसात नंदादीप इमारतीत पहाटे २.२५ वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर इमारतीतील १७ कुटुंबांना तात्काळ स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.


 तसेच शेजारील दोन इमारतींतील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर प्रभाग समिती आणि बांधकाम विभाग यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू असून, अशा जुनाट आणि धोकादायक इमारतींच्या स्थितीकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, हे या प्रकारावरून पुन्हा अधोरेखित झाले आहे.


Comments
Add Comment

उबाठा गटाचे माजी नगरसेवक रामदास कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

रामदास कांबळे यांची युवासेना कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती जाहीर ठाणे: मुंबई महानगरपालिकेतील सायन कोळीवाडा

भारत महासत्ता न होण्यासाठी तरुणाईला अंमली पदार्थांच्या आहारी लोटण्याचा परकीय शक्तींचा डाव

आयआरएस समीर वानखेडे यांचे वक्तव्य कल्याण  : ''आपला भारत देश हा महासत्ता होण्याच्या दिशेने अतिशय विश्वासाने आणि

पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक

कल्याण : पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमुळे राज्य गुप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख

ठाणेकरांनो, पाण्याचा जपून वापरा करा

मंगळवारी ८ तास पाणीपुरवठा बंद डोंबिवली  : केडीएमसीच्या कल्याण (पूर्व) परिसरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेतील

श्रीकृष्णनाथ पांचाळ ठाण्याचे जिल्हाधिकारी

मुंबई : जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांची महाराष्ट्र सरकारने बदली केली असून ठाण्याचे

मध्य रेल्वेची ऐन सकाळी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत, रेल्वे रुळाला तडे गेल्याने नोकरदारांचे झाले हाल

कर्जत: मध्य रेल्वेची लोकल वाहतूक आज सकाळी काही तासांसाठी विस्कळीत झालेली पाहायला मिळाली. पण रेल्वे प्रशासनाच्या