Building Collaps in Thane: ठाण्यात जुन्या इमारतीचा भाग कोसळला; १७ कुटुंबांचे स्थलांतर

  75

ठाणे:  ठाण्यातील वागळे इस्टेटमधील किसननगर परिसरातील नंदादीप इमारतीचा भाग कोसळल्याची घटना (Building Collapses in Thane) घडली. पंचपरमेश्वर मंदिराजवळील नंदादीप या ५० वर्ष जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


तीन मजली असलेल्या नंदादीप इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि तीन छतांचा काही भाग रात्री अचानक कोसळला. घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.



इमारत अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये


महाराष्ट्रात मान्सूनच्या मुसळधार पावसादरम्यान, ठाणे शहरात मंगळवारी पहाटे जुन्या इमारतीचा काही भाग कोसळला, ज्याला नागरी अधिकाऱ्यांनी यापूर्वीच धोकादायक म्हणून वर्गीकृत केले होते. ही घटना वागळे इस्टेट परिसरातील असून, भरपावसात नंदादीप इमारतीत पहाटे २.२५ वाजता ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर इमारतीतील १७ कुटुंबांना तात्काळ स्थलांतरित करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.


 तसेच शेजारील दोन इमारतींतील रहिवाशांनाही सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर प्रभाग समिती आणि बांधकाम विभाग यांच्यामार्फत पुढील कार्यवाही सुरू असून, अशा जुनाट आणि धोकादायक इमारतींच्या स्थितीकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे, हे या प्रकारावरून पुन्हा अधोरेखित झाले आहे.


Comments
Add Comment

आनंदाची बातमी शिळफाटा-कल्याण ते रांजनोली वाहतूककोंडी सुटणार

ठाणे : शिळफाटा-कल्याण ते रांजनोली या पट्ट्यात वाहतूक कोंडी ही रोजची समस्या झाली आहे. यावर उपाय करण्यासाठी

कल्याणमध्ये भीषण अपघात: ट्रकने दुचाकीस्वार महिलेला चिरडले, जागीच मृत्यू

ठाणे: कल्याण पश्चिम येथील निक्कीनगर परिसरात एका दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या