अवकाळीने शेतकऱ्यांवर मोठे संकट

पिकांच्या पंचनाम्याची क्रांतीसेनेची मागणी


राहुरी : तालुक्यातील कोंढवड परिसरात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, बियाण्यासाठी सोडलेल्या घास पिकाचे बियाणे काढणीपुर्वीच मोड फुटल्याने पूर्णतः निकामी झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई- निवेदन पाठवून तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्याची मागणी केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील कोंढवड परिसरात मागील ५ ते ६ दिवसांपासून संततधार अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घास पिक बियाण्यासाठी सोडले होते. यासाठी अळी, मावा, तुडतुडे व फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक औषधांची फवारणी केली. यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च आला आहे. मात्र पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने बियाण्याला काढणीपूर्वीच मोड फुटून ती बियाणे पूर्णतः निकामी झाली आहेत.

परिणामी, या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.राज्य सरकारकडून मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर पंचायत समिती व महसूल विभागाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

गावातील तलाठी यांना याबाबत कळवले असता, त्यांच्याकडे अशा प्रकारचे कोणतेही आदेश नसल्याचे त्यांनी सांगितले. तरी आपले सरकार हे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती संवेदनशील आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत. तालुक्यातील कोंढवड परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीसह अवेळी पडणाऱ्या पावसाच्या आपत्तीमुळे बाधित झालेल्या चिंताग्रस्त बळीराजाला दिलासा देण्यास राज्य सरकार नेहमीच प्राधान्य देईल,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Comments
Add Comment

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना