मग त्यावेळी आदित्य ठाकरे लंडनमधील नदीची पाहणी करीत होते की पॅरिसमधील?

  48

आशिष शेलार यांचा रोखठोक सवाल


मुंबई : मुंबईकरांची प्रामाणिक सेवा आम्ही करत आहोत आणि कायम करत राहणार. मुंबईत नालेसफाईची कामे सुरु असताना आम्ही पाहणी केली, चुकीचे आढळले तिथे प्रशासनाला सवालही विचारले. मात्र मुंबईचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार आदित्य ठाकरे मुंबईत नालेसफाई होत असताना, रस्त्यांची कामे होत असताना कुठे होते..


लंडनमध्ये जावून थेम्स नदीची आणि पॅरिसमध्ये जावून सीन नदीची पाहणी करत होते का? २६ जुलै २००५ च्या महाप्रलयावेळी महानगरपालिकेचे नेतृत्व करीत असलेले उद्धव ठाकरे रस्त्यांवर उतरले होते का?, या सर्व प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी आधी द्यावीत, असा प्रहार मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री अॅड आशिष शेलार यांनी केला आहे.


मुंबईतील मुसळधार पाऊस व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन, यंत्रणांकडून सुरु असलेली कार्यवाही याबाबत मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी सोमवारी संवाद साधला.


याप्रसंगी मंत्री शेलार म्हणाले की, पहिले तर आदित्य ठाकरे यांना जनतेने सडेतोड प्रश्न विचारला पाहिजे की, पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला आहे. तर नालेसफाई होत असताना, रस्त्यांची कामे होत असताना आदित्य ठाकरे तुम्ही होतात कुठे? मिस्टर इंडियासारखे गायब झाला होतात.
आणि मग ते पाहणी कुठे करत होते? लंडन मधली थेम्स नदी आणि पॅरिस मधली सीन नदी यांची आदित्य ठाकरे पाहणी करत होते का? आज मुंबईकरांच्या वाताहातीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. मागील २५ वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन यामुळे मुंबईची अशी अवस्था झाली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे 'चोर मचाये शोर' याच्यापेक्षा दुसरं काही नाही, असे शेलार यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

आदिवासी समाजाला अतिरिक्त आरक्षण ? मुख्यमंत्र्यांना पाठवणार प्रस्ताव...

मुंबई : राज्यात काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी समाजाची संख्या जास्त आहे.  आदिवासी समाजातील तरुणांना नोकऱ्यांमध्ये