मग त्यावेळी आदित्य ठाकरे लंडनमधील नदीची पाहणी करीत होते की पॅरिसमधील?

आशिष शेलार यांचा रोखठोक सवाल


मुंबई : मुंबईकरांची प्रामाणिक सेवा आम्ही करत आहोत आणि कायम करत राहणार. मुंबईत नालेसफाईची कामे सुरु असताना आम्ही पाहणी केली, चुकीचे आढळले तिथे प्रशासनाला सवालही विचारले. मात्र मुंबईचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार आदित्य ठाकरे मुंबईत नालेसफाई होत असताना, रस्त्यांची कामे होत असताना कुठे होते..


लंडनमध्ये जावून थेम्स नदीची आणि पॅरिसमध्ये जावून सीन नदीची पाहणी करत होते का? २६ जुलै २००५ च्या महाप्रलयावेळी महानगरपालिकेचे नेतृत्व करीत असलेले उद्धव ठाकरे रस्त्यांवर उतरले होते का?, या सर्व प्रश्नांची उत्तरे आदित्य ठाकरे यांनी आधी द्यावीत, असा प्रहार मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री अॅड आशिष शेलार यांनी केला आहे.


मुंबईतील मुसळधार पाऊस व त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन, यंत्रणांकडून सुरु असलेली कार्यवाही याबाबत मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांनी प्रसारमाध्यमांशी सोमवारी संवाद साधला.


याप्रसंगी मंत्री शेलार म्हणाले की, पहिले तर आदित्य ठाकरे यांना जनतेने सडेतोड प्रश्न विचारला पाहिजे की, पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झाला आहे. तर नालेसफाई होत असताना, रस्त्यांची कामे होत असताना आदित्य ठाकरे तुम्ही होतात कुठे? मिस्टर इंडियासारखे गायब झाला होतात.
आणि मग ते पाहणी कुठे करत होते? लंडन मधली थेम्स नदी आणि पॅरिस मधली सीन नदी यांची आदित्य ठाकरे पाहणी करत होते का? आज मुंबईकरांच्या वाताहातीला कोण जबाबदार याचं थेट उत्तर आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. मागील २५ वर्षात कट कमिशनचा धंदा, कंत्राटदारांशी कट कमिशन यामुळे मुंबईची अशी अवस्था झाली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे 'चोर मचाये शोर' याच्यापेक्षा दुसरं काही नाही, असे शेलार यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती